जळगाव, दि. २ मे (जिमाका वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या "एक जिल्हा, एक नोंदणी" या नव्या योजनेची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यात १ मे २०२५ पासून सुरू झाली आहे. या योजनेनुसार जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक (वर्ग-१ व वर्ग-२) कार्यालयांचे दस्तऐवज नोंदणीचे कार्यक्षेत्र आता सामायिक करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील मालमत्ता जसे की भूखंड, शेती, तयार घरे आदींची खरेदी-विक्री, हक्कसोड तसेच अन्य नोंदणी व्यवहार आता जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी दस्तऐवज नोंदणीची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या संदर्भात राज्य शासनाने अधिसूचना जारी केली असून, त्याची अंमलबजावणी १ मे २०२५ पासून करण्यात आली आहे. यासंदर्भात सह जिल्हा निबंधक (वर्ग-१) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी जळगाव श्री. सुनील पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे या बाबींची माहिती दिली आहे.
00000000000
---
No comments:
Post a Comment