Thursday, 22 February 2018

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 28 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन



        जळगाव,दि.22:-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 10 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसुचीत जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन निवास व इतर सुविधा उपलब्घ करुन देणेसाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वाधार योजना सुरु केलेली आहे.
          सदरील  योजनेच्या लाभासाठी पात्र असणा-या विदयार्थ्यांना या योजनेअंतर्गत सन 2017-18 साठी अर्ज करण्याची मुदत वाढ करण्यात आली असुन सदर अर्ज दिनांक 28 फेब्रुवारी 2018 अखेर पावेतो सादर करता येतील, तसेच यापुर्वी दिलेल्या सुचनेनुसार विदयार्थ्याने त्याच्या रहिवाशी जिल्हयामध्ये (विदयार्थी जिल्हा) या योजनेसाठी अर्ज करावयाचा होता. आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून विदयार्थी ज्या जिल्हयामध्ये शिक्षण घेत आहे (कॉलेज जिल्हा) त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय यांचेकडे अर्ज सादर करु शकतील. संबधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, हे विदयार्थ्यानी सादर केलेला अर्ज व अर्जासोबत प्राप्त कागदपत्रांची पडताळणी करुन नियमानुसार प्राप्त अर्जामधुन गुणवत्तेनुसार जिल्हयाला मिळालेल्या इष्टांकाच्या अधिन राहून पात्र लाभार्थ्याची निवड करुन मंजुर करतील.
          तरी जिल्हास्तरीय मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये किमान दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी असलेल्या अभ्यासक्रमात प्रवेशित असलेल्या अनुसुचीत जाती तथा नवबौध्द प्रवर्गातील विदयार्थ्यांनी सन २०१७-१८ या वर्षासाठी दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ अखेर या कार्यालयाकडे योजनेचे अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त, खुशाल गायकवाड, जळगाव यांनी केलेले आहे.
000

No comments:

Post a Comment