Thursday, 19 September 2019

जिल्ह्यात 3 ऑक्टोबरपर्यंत कलम 37 (3) लागू


            जळगाव, दि. 19 - आगामी सण, उत्सव व विधानसभा निवडणूका यासारखे कार्यक्रम लक्षात घेता शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पांच किंवा पांच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास व किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. सदरचा आदेश 13 ऑक्टोंबर, 2019 पर्यंत लागू राहील असे अपर जिल्हादंडाधिकारी वामन कदम यांनी आदेशात म्हटले आहे.
            सदरचा आदेश हा लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका व प्रेत यात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव श्री. वामन कदम यांनी कळविले आहे.
000

No comments:

Post a Comment