जळगाव, दि. 24 - प्लॅस्टिकमुक्त पर्यावरणासाठी प्रत्येक
नागरिकाने स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करून प्लॅस्टिक विरहित जीवनशैली आचरणात
आणून आपला परिसर स्वच्छ राखण्यासाठी
प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
यांनी आज केले.
कवयित्री
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व भरारी
बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्लॅस्टिकमुक्त जळगाव संकल्प
अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ राष्ट्रीय सेवा योजना दिनी आज
शिवतीर्थ मैदानावर डॉ. ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रासेयो चे
स्वयंसेवक, शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित मान्यवरांना जिल्हाधिकारी डॉ.
अविनाश ढाकणे यांनी प्लॅस्टिक मुक्तीची शपथ दिली. तसेच मान्यवर व स्वयंसेवकांनी
प्लॅस्टिक संकलन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्लॅस्टीकमुक्ती जनजागृती
पोस्टर्स चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, प्रत्येक नागरीकाने या मोहिमेत सहभागी होऊन आपला
जिल्हा प्लॅस्टीकमुक्तीसह स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी आपले योगदान द्यावे, मागील
पिढीने केलेल्या चुकांची शिक्षा तरुण पिढीला होवू नये याकरीता विद्यार्थ्यांनी या
मोहिमेत आपला सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जनजागृती
रथाला डॉ. ढाकणे यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला.
याप्रसंगी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मनपा आयुक्त डॉ. उदय
टेकाळे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर
महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पी. पी. माहुलीकर, कृषी उपसंचालक अनिल
भोकरे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, रासेयो चे कार्यक्रम अधिकारी डॉ.
पंकजकुमार नन्नवरे, उद्योगपती रजनीकांत कोठारी, अनिल कांकरिया, पिपल्स बँकेचे
अध्यक्ष भालचंद्र पाटील, स्मिता बाफना, हेमंत कोठारी, स्वरुप लुंकड आदी मान्यवर
उपस्थित होते.
यावेळी
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील, महापालिका आयुक्त् डॉ. टेकाळे, प्र कुलगुरु
श्री. माहुलीकर यांचेसह मान्यवरांनी स्वच्छतेचे महत्व विशद करुन प्लॅस्टीकमुळे
पर्यावरणाची होणारी हानी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्लॅस्टिक मुक्ती व
स्वच्छतेच्या विषयावर विनोद ढगे व सहकाऱ्यांनी
पथनाट्य सादर केले.
कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, महेश पाटील, सचिन महाजन,
विक्रांत चौधरी, अक्षयकुमार पाटील, गोपाळ कापडणे, रोशन गांधी, आकाश धनगर, आयुष
मणियार, अभिषेक बोरसे, दुर्गेश आंबेकर आदींनी सहकार्य केले. या अभियानांतर्गत
निबंध स्पर्धा, पथनाट्य, वक्तृत्व स्पर्धा, भिंती पत्रक, चित्ररथ या माध्यमातून
जनजागृती करण्यात येवून स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार
आहे. या अभियानासाठी के. के कॅन्स व
नवजीवन यांचे सहकार्य लाभल्याचे संस्थेचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले .
000
No comments:
Post a Comment