Saturday, 21 September 2019

सार्वजनिक मालमत्ता विद्रुप न करण्याचे आवाहन


        जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 21:- भारत निवडणूक आयोगाने  21 सप्टेंबर  रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 ची घोषणा केली आहे. या तारेखपासून  निवडणूकीची आदर्श आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू झालेली असल्याने विना परवाना सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्ता विद्रुप करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

            दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपट्री ॲक्ट 1995 व भारत निवडणुक आयोग दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्देश यानुसार विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहीणे, निवडणुक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर करणाने सदर मालमत्ता विद्रुपित करण्यावर बंदी घातलेली आहे.
            अशाप्रकारे राजकीय पक्ष/उमेदवाराने खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित केली असल्यास त्यांनी अशी पोस्टर्स, भित्तीपत्रके, घोषणा, झेंडे, कापडी फलक व चिन्ह इत्यादी काढून टाकण्याची तातडीने कार्यवाही करावी.
            दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपट्री ॲक्ट 1995 अन्वये अशाप्रकारे मालमत्ता विद्रुपित केल्यास 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षेस संबंधित इसम पात्र राहील याची नोंद घ्यावी.
0 0 0 0 0

No comments:

Post a Comment