Friday, 13 September 2019

कृषि विभागामार्फत पुरग्रस्तांच्या पाल्यांना 7 हजार 500 वह्या रवाना



             

           जळगाव, दि. 12 - गेल्या महिन्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात पुरामुळे अनेक गावे पाण्यात गेल्याने नागरीकांचे संसारोपयोगी वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  राज्य शासनासह अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी या पुरग्रस्तांना संसार उपयोगी व इतर जीवनावश्यक वस्तुंची मदत उपलब्ध करुन दिली आहे.
            सद्य:स्थितीत तेथील परिस्थितीचा आढावा घेवून अन्नधान्य व कपडे या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याचे तेथील शिक्षणाधिकारी यांचेशी चर्चा करता लक्षात आले ओ. त्यानुसार कृषि विभाग, जळगाव, खते, बियाणे, किटकनाशके डिलर्स असोसिएशन, जळगाव व जळगाव जिल्हा कृषि विपणन संघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जमा करण्यात आलेल्या निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यामधील पुरग्रस्त नागरीकांच्या पाल्यांना शालोपयोगी साहित्य पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. व लगेचच त्याची अंमलबजावणी म्हणून 7 हजार 500 वह्या रवाना करण्यात आल्या.
            वह्या घेऊन जाणाऱ्या वाहनास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री. राऊत, कृषि अधिकारी सुहास पाटील, डिलर्स् असोसिएशनचे पदाधिकारी सर्वश्री. ललीत लोढा, विजय जैन, एस. के. अग्रवाल, कृषि विपणन संघाचे प्रतिनिधी सुनिल मुळे, भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक परदेशी यांचेसह कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment