Friday, 30 August 2024

चिंचोली येथील प्रस्तावित 'मेडिकल हब' ची मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली पाहणी ▪️ प्रकल्पाच्या कामाला वेग घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना








 जळगाव दि. 30 ( जिमाका ) तालुक्यातील चिंचोली येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम वेगाने सुरु आहे. या प्रकल्पाची शुक्रवारी दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पाच्या कामाला लवकर पूर्ण करण्याच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

चिंचोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवीन इमारतींचे बांधकाम वेगात सुरु आहे. याठिकाणी महाविद्यालय, रुग्णालय, वसतिगृह, अतिथीगृह, प्राध्यापक निवासस्थान, अधिष्ठाता कार्यालय असे विविध प्रकल्प उभारले जात आहे. शुक्रवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे यांनी पाहणी केली. यावेळी एचएससीसी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक  संदीप जैन, विभागीय प्रमुख भीमराव कांबळे, न्याती कन्स्ट्रक्शनचे विभागीय मुख्य अभियंता संदीप गाडेकर, एक्झिक्युटिव्ह अभियंता शरद दवांगे उपस्थित होते. 

यावेळी संदीप गाडेकर आणि संदीप जैन यांनी मंत्री महाजन, जिल्हाधिकारी, अधिष्ठाता व अधिकाऱ्यांना प्रकल्पाचे आतापर्यंत झालेले बांधकाम व त्यातील रचना, मांडणी, कामाचा दर्जा याबाबत माहिती दिली. पूर्ण प्रकल्पाला जाऊन अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बांधकामातील साहित्य, साधनसामुग्रीचा माहिती घेतली. नकाशाद्वारेदेखील बांधकामाची माहिती मंत्री महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांना देण्यात आली.  यावेळी गिरीश महाजन यांनी समाधान व्यक्त केले. पाणी, रस्ते, वीज, कंपाऊंड वॉलसाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सूचित केले. 

प्रकल्प कार्यालयात मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी, अधिष्ठाता यांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी पिपीटीद्वारे माहिती दिली. प्रकल्प कुठवर पूर्णत्वास गेला आहे तसेच पूर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच निवास व्यवस्था तयार झाल्यावर भविष्यात कसे दिसेल याचे एक प्रतीचलचित्र (व्हिडिओ) दाखवण्यात आले.

प्रकल्पाच्या ठिकाणी कामगारांना स्वतंत्र कॉलनी उभारण्यात आली असून त्यांच्या सर्व सुरक्षेची काळजी घेतली जात असल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शासकीय विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांचेसह अधिष्ठाता कार्यालयातील

बांधकाम विभागाचे साहेबराव कुडमेथे आदी उपस्थित होते.

                                                          00000000000

इस्राईल मध्ये बांधकाम तसेच नर्सिग व पॅरामेडिकल क्षेत्रात एक लाख उमेदवारांना रोजगाराची सुवर्णसंधी

 

       जळगाव, दि.30 (जिमाका वृत्तसेवा) : -  महाराष्ट्रातील कुशल बेरोजगार युवक युक्तीना इस्राईल येथे रोजगारासाठी महाराष्ट्र शासनाची योजना स्वप्नांची क्षितिजे विस्तारणार युवकाना संधी

बांधकाम क्षेत्रातील खालील कौशल्य असलेल्यांना रोजगाराची संधी

फेनवर्क / शटरिंग कारपेंटिग, लोखंड वाकवणे/बार बेन्डींग (शटरिंग काम), पॉलिश फरशी काम (सिरेमिक टाइल्स), गिलावा काम (प्लास्टरिंग काम)

नर्सिंग पॅरामेडिकल क्षेत्रात खालील कौशल्य असलेल्यांना रोजगाराची संधी

वृध्दाची / आजारी व्यक्तींची काळजी देखभाल घेणे,  इंजेक्शन, ड्रेसिंग इ. वैद्यकीय कामाचे कौशल्य इ, तात्काळ उपचार करण्याबाबतची माहिती

 इच्छूक उमेदवारांसाठी पात्रता

इस्राईल मध्ये काम करण्याची इच्छा,  उमेदवाराला जुजबी इग्रजी विषयाचे ज्ञान, क्षेत्रासंबधी प्राथमिक कौशल्य व प्रमाणपत्र,  किमान सहा महिने वैध असणारा पासपोर्ट, किमान शिक्षण अट नाही,  वयोमर्यादा प्रदीर्घ २५-४५ वर्षे,  कोणताही प्रदीर्घ आजार नसावा.

          इस्राईल येथे नोकरी मिळविण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, आरोग्य विषयक तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी सपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येईल. या प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारास अंदाजित रु.१ लाख ३७ पर्यंत मासिक वेतनाची संधी व आतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी,  कॉन्ट्रेक्ट कालावधी किमान ३ वर्ष,  पुढील टप्यात यासह इत्तर क्षेत्रातील एक लाख कौशल्यधारकांना व युवतींना केअरगिबिग (Caregiving), नर्सिंग पॅरामेडिकल क्षेत्रात मोठ्या रोजगाराची संधी,  इच्छुक उमेदवारानी अधिक माहितीसाठी हेल्प लाईन १८००१२०८०४० येथे तात्काळ संपर्क साधावा,  बांधकाम क्षेत्रातील इच्छूकांनी पुढील लिंकवर नोदणी करावी :https://t.Jy/FMYyR असे कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी दुसाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000000

जर्मन देशातील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास देणार महाराष्ट्र राज्यातील कुशल वाहनचालक

        जळगाव, दि.30 (जिमाका वृत्तसेवा) : -  जर्मन  देशातील बाडेन-युटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करण्यात आलेला असून, ज्यामध्ये वाहनचालकांचा समावेश असून, सदर कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी क्र.०१ च्या शासन निर्णयानुसार कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे.       

          १. सदर प्रकल्पाअंतर्गत जर्मनीस जाण्यासाठी, इच्छुक वाहनचालकांनी शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या QR Code वर स्कॅन करुन त्यावर दिलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबत अर्ज भरावा.

          २. दिलेल्या QR Code स्कॅन अर्जदाराने कशाप्रकारे अर्ज करावा याबाबतची प्रक्रिया सादरीकरणात उपलब्ध करुन देण्यात आलेलीआहे.

          ३. बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास कुशल वाहन चालक पुरविण्याच्या प्रकल्पाबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे एक हेल्प डेस्क कक्षाची उभारणी करण्यात आलेली आहे. तसेच बाडेन-बुटेनबर्ग या राज्यास कुशल वाहन चालक पुरविण्याच्या प्रकल्पाबाबत कार्यालयाच्या प्रथमदर्शनी भागास माहिती पत्रक लावण्यात आलेले आहे.

          जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्र राज्यातील कुशल वाहनचालक होण्याची संधीचा सर्व वाहनचालक यांनी लाभ घ्यावा, असे मोटार वाहन निरीक्षक तथा प्रभारी सहा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश दुसाने  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

                                      0000000000

Thursday, 29 August 2024

२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त विविध क्रीडा उपक्रम आणि खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले

 











       जळगाव, दि.29 (जिमाका वृत्तसेवा) : -  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा प्रशासन जळगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, क्रीडा भारती, जळगाव व जळगाव जिल्हा विविध खेळ संघटनेना विविध क्रीडा मंडळे यांच्या सहकार्याने २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे साजरा करण्यात आला. हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सकाळी ६.३० वाजता जळगाव सायकलीस्ट यांच्यासह जळगाव शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर सायकल रॅलीला आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा छत्रपती पुरस्कारार्थी श्री. कीशोर चौधरी (राज्य क्रीडा मार्गदर्शक- सॉफटबॉल) यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. सदर रॅलीचा मार्ग जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथून श्री. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा टॉवर चौक,  चित्रा चौक,  पुष्पलता बेडांळे चौक, पांडे चौक- स्वांतत्रय चौक मार्गे परत जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे सांगता झाली. सदर सायकल रॅलीत शासकीय व निमशासकीय अधिकारी व नामवंत सायकल पटु यांनी सहभाग घेतला. रॅलीतून खेलेगा इंडिया तो खिलेगा इंडिया तसेच Play for Fun, Fitness & Hapiness च्या  घोषणा देण्यात आल्यात.

          त्याचप्रमाणे सकाळी ९.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुलातील बहुउद्देशीय सभागृहा मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उदघाटन मा. जिल्हाधिकारी व्ही केझो प्रोबेशनरी आय एस ऑफीसर तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जळगांव व मा. रणजीत राजपूत राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी यांच्या हस्ते झाले. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला जळगाव जिल्हा मल्लखांब संघटेनेच्या सहकार्याने मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानंतर जळगाव जिल्हा योगा संघटनेच्या वतीने योगाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर संजीवनी गृप च्या वतीने पारंपारीक खेळ प्रकार मंगळागौर बाबत माहिती  देवून प्रात्यक्षिक सादर केले. 

          राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधुन जळगाव जिल्हयाचे गतवर्षातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त व सहभागी खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर दिनांक २६ ते २९ ऑगस्ट २०२४ या कालावधी दरम्यान राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडुंना मेडल व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच योगाच्या क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी यांनी सर्व खेळाडूंना फिटनेस ची प्रतीज्ञा दिली. आजच्या सोशल मिडीयाच्या युगात पारंपारीक खेळ जिवंत राहण्याकरीता व संध्याच्या पिढीला अवगत होण्यासाठी लंगडी, लगोरी, विंटी दांडू, भोवरा, सोंगट्या, सारीपाट, टायर फिरविणे, लिंबू चमच, दोरी उडया, गोटया अशा विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले. सदर खेळात शिवछत्रपती पुरस्कार श्री. प्रदिप तळवेलकर यांनी हिरारीने भाग घेतला.

          सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव रविंद्र  नाईक यांनी 

केले प्रस्ताविकात त्यांनी खेळाडू सर्व उपस्थितांना Play for Fun, Foness & maciness व मंत्र 

देवून  नियमित सहाय्यक जिल्हाधिकारी की झोप्रोबेशनरी आयएस  ऑफीसर यानी खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात जिल्हयातील राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी श्री रणजीत राजपूत शिवछत्रपती पुरस्काराकी विशाल फिरके, तालुका क्रीडा अधिकारी श्री जगदीश श्रीराग श्री. फारुख शेख श्री राजेश जाधव, श्री. प्रशांत कोल्हे, श्री वसीम निर्मा, श्री. आसिफ खान, तसेच जगाय जिल्हयातील शाळा, संस्था व महाविद्यातील कीडा शिक्षक मार्गदर्शक खेळाडू व पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  श्रीमती सुजाता गुल्हाने यांनी तर आभार सुरेश बरकुडे यांनी केले. सदर कार्यक्रम कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात, श्रीमती चंचल माळी, भारत देशमुख, गोविंद सोनवणे, संजय महिरे, उमेश मराठे,  विनोद कुलकर्णी, विनोद माने, सुरज पवार, निलेश बाविस्कर,        अविनाश महाजन यांनी परिश्रम घेतले. असे जिल्हा क्रीडा अधिकारी रविद्र नाईक यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००००००


भारतीय डाक विभागात डाक जीवन बिमा अभिकर्ता या पदासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड

        जळगाव, दि.29 (जिमाका वृत्तसेवा) : -  भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजने अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे अभिकत्यांची नेमणूक करण्यात येत आहे. त्यासाठी जळगाव जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सोमवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11:00 ते 3:00 वाजेपर्यंत अधीक्षक डाकघर जळगाव डाक विभाग जळगाव, मुख्य पोस्ट ऑफिस जळगाव मागील बाजू या ठिकाणी 10 वी, 12 वी च्या शैक्षणिक कागदपत्रासह व फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड सहित मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात येते.

          पात्रता व अटी.1) वय मर्यादा वय वर्ष 18 ते पूर्ण असावे  2) शैक्षणिक अहर्ता - उमेदवार हा कमीत कमी 10 वी पास असणे आवश्यक आहे. 3) अनुभव - इच्छुक उमेदवारास विमा पॉलीसी विक्रीचा अनुभव (Marketing Skill)  स्थानिक भागाची पूर्णत: मातिी असावी. 4) श्रेणी -बेरोजगार, स्वयं रोजगार, माजी जीवन विमा सल्लागार,  माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडल बाबतचे सर्व अधिकार अधिक्षक डाकघर जळगाव विभाग जळगाव योचकडे राखीव आहेत. असे अधिक्षक डाकघर जळगाव विभाग जळगाव यांनी  प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

                                                          00000000

Wednesday, 28 August 2024

विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वात महत्वाची ; जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही बसणार - पालकमंत्री गुलाबराव पाटील




जळगाव दि. 28 ( जिमाका ) जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी.सी.टी.व्ही लावण्याची सूचना राज्य शासनाने दिली आहे. आम्ही जिल्ह्यातील गोरगरीबांची मुल, मुली ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकतात तिथे सी.सी.टी.व्ही लावणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

  आज जिल्हा नियोजन भवन मध्ये जिल्ह्यातील सर्व विभागाच्या चालू वर्षाच्या नियोजन निधीच्या खर्चाच्या संदर्भात आढावा बैठक घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते. 

   आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व यंत्रणांनी मंजुर कार्माच्या 100 टक्के वर्क ऑर्डर 31 सप्टेंबर पर्यंत पूर्ण कराव्यात असे निर्देश देऊन सन 2024-25 अंतर्गत दिनांक 5 सप्टेंबर 2024 पुर्वी जिल्हा परिषदेने उर्वरित 100 टक्के कामांना प्रशासकीय मान्यता द्याव्यात अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 

   राज्य शासकीय यंत्रणांनी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत 100 टक्के कामांना प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडे सादर करावेत जेणेकरुन आचारसंहितेपुर्वी कामे कार्यारंभ आदेश देऊन कामं सुरु करता येऊ शकतील. मागील कालावधीत ज्याप्रमाणे आपले सर्वांचे सहकार्य लाभले व 100% निधी खर्च झाला त्याप्रमाणे येत्या काळातही आपण सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले.

    मंजूर कामे दर्जेदार व मुदतीत पुर्ण करुन प्रशासकीय दिरंगाई व कामाच्या गुणवत्तेतील चालढकल खपवून घेतली जाणार नाही असे सांगून जिल्ह्यातील ओ.डी.आर.आणि व्ही. आर. रस्त्यांच्या दर्जोंन्नतीसाठी च्या कामांचे प्रस्तावशासनाकडे तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

प्रलंबित असलेली व खासदार, आमदार आणि नव्याने सुचविलेली कामे मार्गी लावावीत. महावितरण, वन विभाग, अंगणवाडी बांधकामे,  कौशल्य विकासची कामे,  परिवहन विभाग यांच्याकडील कामे तात्काळ मंजूर करावेत अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. ज्या प्रमाणे "मुख्यमंत्री लाडकी बहिण" योजने अंतर्गत तळागाळातील सर्वसामान्य भगिनांना लाभ रक्षाबंधनची भेट म्हणून लाभ मिळण्यासाठी व लखपती दीदी कार्यक्रमासाठी सर्व यंत्रणांनी व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले त्याच प्रमाणे मुख्यमंत्री वयोश्री योजना व तीर्थदर्शन कार्यक्रम योजनांचा वृद्धांना लाभ मिळावा याकरीता या योजनांची सक्षमतेने अंमलबजावणी असे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. 

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व विभागाच्या कामाचे सादरीकरण करून विविध विभागांना कामाचा वेग वाढविण्याची सूचना दिली.

                                                                    0000000000


 

जिल्हाधिकारी कार्यालयात ३ सप्टेबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

           जळगाव दि. 28 ( जिमाका )  -  जिल्हास्तरावर लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. तथापी,सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी २ सप्टेंबर २०२४ या दिवशी शासकीय सुट्टी असल्यामुळे या महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता  अल्पबचत सभागृह  जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

            नागरिकांनी आपल्या वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी आपल्या संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000000

Tuesday, 27 August 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" मेळावा

        जळगाव दि. 27 ( जिमाका )  - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव / मॉडेल करीअर सेंटर, जळगाव तर्फे जिल्हयातील युवक/युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यांत आलेले आहे.

          शैक्षणिक अर्हतेनुसार विद्यावेतनाचे विवरण -  शैक्षणिक अर्हता  -१)  १२ वी पास, प्रतिमाह विद्यावेतन -  रु.६०००/- २) आय.टी.आय. / पदविका रु. ८०००/- ३) पदवीधर / पदव्युत्तर रु.१०,०००/-

          उमेदवारांचे शैक्षणिक अर्हतेनुसार वरील प्रमाणे विद्यावेतन देण्यांत येणार आहे. या योजनेसाठी उमेदवाराची कमीत कमी शैक्षणिक पात्रता १२ वी पास असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी १२वी/ आय.टी.आय/ पदविका/ पदवी/ पदव्युत्तर उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार तसेच शिकाऊ उमेदवारी NAPS/MAPS अंतर्गत प्रशिक्षण घेतलेले उमेदवार या योजनेत सहभागासाठी पात्र असणार नाहीत. प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने राहील.

          उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराने कौशल्य रोजगार व उदयोजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बैंक खाते आधार संलग्न असावे आणि उमेदवारचे किमान वय १८ ते ३५ वर्ष असावे.

          याबाबत काही तांत्रिक अडचणी आल्यास अथवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) या कालावधीत सकाळी ०९.४५ ते सांयकाळी ०६.१५ वाजेपर्यंत स्थानिक जळगाव कार्यालयाशी ०२५७-२९५९७९० वर कार्यालयीन वेळेत दूरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, प्र. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव रा.नि. वाकोडे, यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

००००००००००

 

पेंशन अदालत वृत्तीवेतन धारकांसाठी

       जळगाव दि. 27 ( जिमाका ) – महाराष्ट्र शासनातील निवृत्तीवेतन धारकासाठी अल्पबचत भवन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे दि. 28 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी  2.00 वाजता पेंशन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.

          सर्व निवृत्ती वेतनधारकांनी या अदालत मध्ये सहभागी होवून या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये  केले आहे.

०००००००००

Monday, 26 August 2024

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

  जळगाव दि. 26 ( जिमाका )  - महानगरपालिका विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या  विदयार्थ्यांना ( भटक्या जमाती क- पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेणारे धनगर समाजाचे विदयार्थी वगळून )  विदयार्थ्यांना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून इ. 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण व व्यवसायिक शिक्षण अभ्याक्रमाच्या महाविदयालयांमध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेव्दारे   प्रथम, व्दीतीय, तृतीय, चतुर्थ वर्षात (प्रत्येकी 150) प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या  एकूण 600 विदयार्थ्यांना गुणवत्तेनुसार भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विदयार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करणेकरीता शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार  योजना  ( भटक्या जमाती क- पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम योजनेचा लाभ घेणारे धनगर समाजाचे विदयार्थी वगळून) सुरु केलेली आहे. 

  विदयार्थी इमाव / विजाभज/ विमाप्र प्रवर्गाचा असावा, विदयार्थ्याने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील 

  विदयार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2,5, 000/- पेक्षा जास्त नसावे,  शैक्षणिक संस्था जेथे आहे तेथील विदयार्थी स्थानिक रहिवासी नसावा,  विदयार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, विदयार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा, जास्तीत जास्त 5 वर्ष लाभ देय राहील, इ. 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. जास्तीत जास्त  5 वर्ष लाभ देय राहील,  इ. 12 वी मध्ये किमान 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण / CGPA  मिळालेले विदयार्थी योजनेस पात्र राहतील, विदयार्थ्याने निवडलेला शैक्षणिक अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा, एकच अभ्यासक्रम पूर्ण करणेपर्यंत सदर योजना लागू राहील, एका विदयार्थ्यास जास्तीत जास्त 5 वर्ष सदर योजनेचा लाभ घेतो, विदयार्थ्याने मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थांमध्येच प्रवेश घेतलेला असावा. व केद्रभुत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश असणे बंधनकारक , योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता विदयार्थ्यांची महाविदयालयीन उपस्थिती किमान 75% असणे बंधनकारक राहील तिमाही हजेरी कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील.

  विदयार्थ्याची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल तसेच विदयार्थ्यांने शासकीय वसतीगृह प्रवेशाकरिता  पात्र विदयार्थ्यांनी आदिवासी विकास  विभागाच्या समाजिकन्याय विभागाच्या / इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या / संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये वसतीगृहास प्रवेश अर्ज सादर केलेला असावा, तसेच मोफत प्रवेश न मिळालेला विदयार्थी पात्र असेल.

  निवड करण्यात आलेला विदयार्थी संबंधित अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यत लाभास पात्र राहील मा प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.इ.  एकाच शाखेच्या पदवीकरिता सदरचा लाभ प्राप्त होईल 70% जागा व्यवसायिक व 30% जागा बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता राखीव रहातील.

  इतर  मागाव प्रवर्ग / विमुक्त जाती भटक्या जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने अंतर्गत लाभासाठी विदयार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज भरुन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर महाबळ जळगाव येथे दि. 30 सप्टेंबर, 2024 पर्यंत उच्च शिक्षणाचे व्दितीय, तृतीय, चतूर्थ वर्ष  प्रवेशाकरिता व प्रथम वर्ष प्रवेशाकरिता दि. 15 ऑक्टोंबर, 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन विभाग योगेश पाटील यांनी केले आहे. सदरचा अर्ज ऑफलाईन असून कार्यालयात उपलब्ध असून सविस्तर माहिती करिता विदयार्थ्यांनी कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग जळगाव यांनी कळविले आहे.

                                                                            ०००००००००

पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

  जळगाव दि. 26 ( जिमाका )  - महानगरपालिका,विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विदयार्थ्यांना इ. 12 वी नंतरच्या मान्य्ताप्राप्त तंत्रशिक्षण व व्यवसायिक शिक्षण अभ्याक्रमाच्या महाविदयालयांमध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेव्दारे  प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विदयार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विदयार्थ्यांच्या आधार संलग्न  बँक खात्यावर थेट जमा करणेकरीता शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु केलेली आहे. 

  विदयार्थी धनगर समाजाचा असावा , विदयार्थ्याने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील,

विदयार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2,5.,000/- पेक्षा जास्त नसावे, शैक्षणिक संस्था जेथे आहे तेथील विदयार्थी स्थानिक रहिवासी नसावा, विदयार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा, जास्तीत जास्त 5 वर्ष लाभ देय राहील, इ. 12 वी मध्से किमान 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण / CGPA  मिळालेले विदयार्थी योजनेस पात्र राहतील, विदयार्थ्याने निवडलेला शैक्षणिक अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा, एकच अभ्यासक्रम पूर्ण करणेपर्यंत सदर योजना लागू राहील, एका विदयार्थ्यास जास्तीत जास्त 5 वर्ष सदर योजनेचा लाभ घेतो, विदयार्थ्याने मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थांमध्येच प्रवेश घेतलेला असावा. व केद्रभुत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश असणे बंधनकारक , योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता विदयार्थ्यांची महाविदयालयीन उपस्थिती किमान 75% असणे बंधनकारक राहील तिमाही हजेरी कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील.

  विदयार्थ्याची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल तसेच विदयार्थ्यांने शासकीय वसतीगृह प्रवेशाकरिता  पात्र विदयार्थ्यांनी आदिवासी विकास  विभागाच्या समाजिकन्याय विभागाच्या / इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या / संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये वसतीगृहास प्रवेश अर्ज सादर केलेला असावा, तसेच मोफत प्रवेश न मिळालेला विदयार्थी पात्र असेल.

  अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, अखिल भारतीय वैदयकीय परिषद भारतीय फार्मसी परिषद, वास्तूकला परिषद, राज्य शासन मान्यता प्राप्त महाविदयालयामध्ये मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास केंद्रिभूत प्रवेश  प्रक्रियेव्दारे प्रवेशित व्यवसायिक / व्यवसायिक  अभ्यासक्रमाचा विदयार्थी असावा

  निवड करण्यात आलेला विदयार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील, मात्र प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

  एकाच शाखेच्या पदवीकरिता सदरचा लाभ प्राप्त होईल, 70% जागा व्यवसायिक व 30% जागा बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता राखीव रहातील.

  वरील प्रमाणे पंडीत दिनदयान उपाध्यये स्वयंम योजने अंतर्गत लाभासाठी विदयार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज भरुन सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग जळगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मायादेवी मंदिरासमोर महाबळ जळगाव येथे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता दिनांक 30 सप्टेंबर,2024 पर्यंत उच्च शिक्षणाचे व्दितीय, तृतीय, चतुर्थ वर्ष प्रवेशित विदयाथ्यांकरिता व प्रथम वर्ष प्रवेशित विदयार्थ्यांकरिता 15 ऑक्टोबर, 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

  असे आवाहन सहाय्यक संचालक इतर बहुजन कल्याण विभाग योगेश पाटील यांनी केले आहे. सदरचा अर्ज ऑफलाईन असून कार्यालयात उपलब्ध असून सविस्तर माहिती करिता विदयार्थ्यांनी कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन सहाय्य्क संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग जळगाव यांनी कळविले आहे.

                                                                     ०००००००००

निवृत्तीवेतन धारकांसाठी 28 ऑगस्ट रोजी पेंशन अदालत

     जळगाव दि. 26 ( जिमाका ) – महाराष्ट्र शासनातील निवृत्तीवेतन धारकासाठी अल्पबचत भवन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे दि. 28 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी  2.00 वाजता पेंशन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.

     सर्व निवृत्ती वेतनधारकांनी या अदालत मध्ये सहभागी होवून या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये  केले आहे. 

                                                                           ०००००००००

जिल्हाधिकारी कार्यालयात ३ सप्टेबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

   जळगाव दि. 26 ( जिमाका )  -  जिल्हास्तरावर लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. तथापी,सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी २ सप्टेंबर २०२४ या दिवशी शासकीय सुट्टी असल्यामुळे या महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता  अल्पबचत सभागृह  जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

            नागरिकांनी आपल्या वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी आपल्या संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

                                                                                00000000

Sunday, 25 August 2024

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ▪ अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण ▪पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित ▪लखपती दीदी संमेलनाला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 











       जळगाव, दि. २५ : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून २०४७ पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसीत भारताचे ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला. स्वयंसहायता गटाला आर्थिक ताकद देतानाच गरीबांसाठी घरकूल बांधण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. आतापर्यत चार कोटी घरकूल वाटप करण्यात आली असून आगामी काळात ३ कोटी घरे बांधण्यात येतील, त्यात महिलांचे नाव प्रथम असेल, असे त्यांनी सांगितले.

          जळगाव येथील प्राईम इंडस्ट्रीअल पार्क येथे (विमानतळ परिसर) देशपातळीवरील लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी बोलत होते. राज्यपाल डॉ. सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेन्नासानी, केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सर्वश्री संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, आमदार लता सोनवणे यांच्यासह मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. तसेच, कार्यक्रमास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

          प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, महाराष्ट्र ही राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आहे. या राज्याला मातृशक्तीचा समृध्द आणि गौरवशाली वारसा लाभला आहे. त्याचा परदेश दौऱ्यात वेळोवेळी प्रत्यय येतो. अलीकडेच पोलंड दौऱ्यात या संस्कृतीचे दर्शन घडले. जळगाव जिल्हा सुद्धा संत मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांची गोडी आजही प्रत्येकाच्या ओठावर असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

          आपल्या देशाची विकसित राष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे. यामध्ये महिलांचा सहभाग महत्वपूर्ण आहे.  लखपती दीदी योजना ही त्यासाठी महत्वपूर्ण आहे.  मागील एक महिन्यात 11 लाख दीदी लखपती बनल्या. यात 1 लाख दीदी महाराष्ट्रातील आहेत. त्यासाठी राज्य शासन ही पुढाकार घेत आहेत. ही अभिनंदनीय बाब आहे.  लखपती दीदी हे संपूर्ण परिवाराला सशक्त बनविण्याचे अभियान आहे. महिला लखपती दीदी बनने हे संपूर्ण कुटुंबाचे जीवन बदलण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

          एकीकडे विकसित राष्ट्र म्हणून त्या दिशेने काम सुरु असताना महिलांच्या समस्या सोडविण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला असल्याचे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, महिलांसाठी ३ कोटी घरे बांधताना ती त्यांच्या नावावर केली जातील. याशिवाय केंद्र सरकारने जनधन खाते उघडले. मुद्रा योजना सुरू केली. विना तारण कर्ज दिले. यात 70 टक्के महिला आहेत. महिलांच्या कर्तृत्वावर संपूर्ण देशाला विश्वास आहे. त्यांच्यासाठी  स्व- निधी योजना सुरू केली. विश्वकर्मा परिवार अंतर्गत महिलांना जोडले. सखी मंडळ मार्फत 10 कोटी महिला जोडल्या गेल्या आहेत. बचत गटांना गेल्या दहा वर्षांत 9 लाख कोटीची मदत केली, असे त्यांनी नमूद केले.

          प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, महिला बचतगटांना ड्रोन पायलट बनविणार असल्याचे सांगून  त्यासाठीचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येईल. आधुनिक शेतीसाठी महिलांना प्रेरित कऱण्यात येईल. यासाठी महिलांना कृषी सखी करून रोजगार वाढविण्यावर भर राहील. महिलांसाठी अर्थसंकल्पात 3 लाख कोटी रूपयांची तरतूद केली आहे. सेनादलात महिलांचा समावेश केला गेला आहे. स्टार्टअप क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

          महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबाबत कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी दोषींना कडक शासन व्हावे, यासाठी भारतीय न्याय संहिते अंतर्गत कायद्याचा वापर केला जाईल. महिलांवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. महिलांचे सामर्थ्य वाढविण्याबरोबरच त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. यासाठी आवश्यक ती मदतही प्रत्येक राज्यांना केली जाईल, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत राहील, असा विश्वास प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी व्यक्त केला.

          महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. रोजगार आणि गुंतवणूकदार यांचे लक्ष येथे असते. त्यामुळे या प्रयत्नांसाठी राज्य शासनाला सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाविकांना आदरांजली

          दरम्यान, आपल्या भाषणात प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी, नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या यात्रेकरूंबाबत दु:ख व्यक्त केले. याप्रकरणी केंद्र आणि राज्य शासनाने तातडीने पावले उचलली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना तातडीने नेपाळला पाठविले. या दुर्घटनेत जखमींवर चांगले उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटूंबियांना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करणार -एकनाथ शिंदे

          राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 कोटी महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा करण्यात आले. अन्नपूर्णा योजने अंतर्गत तीन गॅस सिलिंडर देण्याची योजना सुरु केली. मुलींना  उच्च शिक्षण मोफत, महिलांना प्रवासात सवलत या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम राज्य शासन करत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री महोदयांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

          देशाच्या ३ कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. देशातील तीन कोटी दीदी मध्ये राज्यातील 50 लाख दीदींचा समावेश राहील. अनेक भगिनी पुढाकार घेऊन छोटे छोटे उद्योग करून कुटूंबाला पुढे नेत आहेत. राज्यात २५ हजार स्वयंसहायता गटांना  ३० कोटींची कर्जे देण्यात आली आहे. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. 

          देशाला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांची भागीदारी आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळत आहे. केंद्र शासनाने 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर विकासाला सहाय्य केले. मेट्रो प्रकल्पाला मदत केली. राज्यातील कांदा, कापूस, दूध, सोयाबीन यांना चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने आणि सिंचन प्रकल्पांना निश्चितपणे मदत करेल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

नेपाल येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी योजना – शिवराजसिंह चौहान

          लखपती दीदी ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आणि विकासाला वेग देणारी अशी योजना आहे. महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन त्यांना स्वावलंबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

          भरपावसात एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्द्ल त्यांनी सर्व भगिनींचे आभार मानले.  महाराष्ट्रात 11 लाख लखपती दीदी झाल्या आहेत.त्यांनी इतरांना प्रेरित करावे, असेही त्यांनी नमूद केले.

देशाच्या विकासात नारीशक्तीचे मोठे योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

          महिला विकासाच्या प्रवाहात आल्यास देशात प्रभावी आणि विकासात्मक बदल घडू शकतो. त्यामुळेच विकासाच्या प्रक्रियेत महत्वाचे स्थान असणाऱ्या नारीशक्तीच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्य शासन सर्वोतोपरी साहाय्य करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

          आज नारीशक्ती विविध क्षेत्रात आपले नाव कमावत आहे. देशाच्या या विकासाच्या भागीदारीत महाराष्ट्र कुठेच कमी पडणार नाही.  संत मुक्ताई आणि कवयित्री बहिणाबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. अशा ठिकाणी हे लखपती दीदीचे संमेलन होत आहे. राज्यात बचतगटामार्फत 75 लाख कुटूंब जोडली गेली असून दोन कोटी कुटूंब जोडण्याचा संकल्प आपण केला आहे. जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या नार-पार सिंचन योजनेला आपण गती दिली. मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर निविदा आणि इतर प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्य शासन नेहमीच महिला भगिनींच्या पाठिशी – उपमुख्यमंत्री अजित पवार

          संपूर्ण देशात सुरू असलेला विकासाचा रथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रुपाने जळगाव जिल्ह्यात आला आहे.  केळी,  कांदा उत्पादन साठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे.  प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचा संकल्प केला आहे. राज्यात  50 लाख लखपती दीदी बनविण्यात येणार आहे, त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

          राज्य शासनाचे प्राधान्य नेहमीच महिलांना सजग, सक्षम आणि सुरक्षित बनविण्याचे राहिले आहे. राज्य शासन नेहमीच महिलांच्या पाठिशी राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लखपती दीदींचा प्रधानमंत्री मोदी यांच्याकडून सन्मान

          दरम्यान, आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील वंदना पाटील, मनीषा जगताप, ज्योती तागडे, सीमा कांबळे, रमा ठाकूर यांच्यासह शीतल नारेट (हिमाचल प्रदेश), महबूबा अख्तर (जम्मू काश्मीर), गंगा अहिरवार (मध्य प्रदेश), एस. कृष्णावेण्णी (तेलंगणा) आणि नीरज देवी (उत्तर प्रदेश), सेरिंग डोलकर (लडाख) यांना यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते लखपती दीदी झाल्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आले.

यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते बचतगटाच्या 48 लाख महिलांना 2500 कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले.

उघडया जीपमधून प्रधानमंत्री मोदी यांचे भगिनींना अभिवादन

          प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे कार्यक्रमस्थळी उघड्या जीपमधून आगमन झाले. यावेळी त्यांनी उपस्थित हजारो भगिनींना अभिवादन केले आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. कार्यक्रमस्थळी उभारलेल्या मंडपामधून प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी फेरी मारली. यावेळी उत्साहाने भारलेल्या वातावरणात उपस्थित भगिनींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबत उपस्थित होते.  

0000000000


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला लखपती दिदींशी संवाद_ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला लखपती दिदींशी संवाद_

 






















         जळगाव,दि.२५ ऑगस्ट (जिमाका) - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जळगाव येथे देशातील निवडक लखपती दीदिंशी शी संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. "लखपती दीदी योजनेमुळे महिला बचतगटांना मिळालेल्या आर्थिक, व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मान ही मिळाला."अशी भावना लखपती दीदींनी यावेळी व्यक्त केली.

         येथील प्राइम इंडस्ट्रियल पार्क मैदानावर झालेल्या लखपती दिदी संमेलनापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक अशा ८० लखपती दीदींशी संवाद साधला. या लखपती दिदी संवाद कार्यक्रमात देशातील वेगवेगळ्या राज्यांतील बॅंक सखी दिदी, ड्रोन दीदी, पशु दिदी, कृषी दिदी म्हणून नावारूपाला येऊन लखपती झालेल्या महिला उपस्थित होत्या.

     यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

                                                                       ०००००००