जळगाव, दिनांक 1 :- राज्य शासनाने आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा
विधायक कार्यासाठी उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना जास्तीत जास्त संधी देवुन
विवेकशील समाज घडविण्यासाठी सोशल मीडिया महामित्र उपक्रम राबविण्याचा निर्धार केला
आहे.
आधुनिक
काळात सोशल मीडिया अत्यंत प्रभावी झाला आहे. बहुतांश युवक मीडियावर सक्रिय असतात.
सोशल मीडिया आता मनोरंजनाचे साधन न राहता ज्ञान उपलब्ध करुन घेण्याचे प्रभावी साधन
ठरले आहे. लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा
सिद्ध झाले आहे. देशातील बहुतांश युवक फेसबुक, व्हॉटसअप, इन्स्टाग्राम, ट्वीटर
आदिंचा मोठया प्रमाणात वापर करतात. त्यामुळे शासनाने सोशल मीडियाची महामित्र
उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
या
उपक्रमातंर्गत प्रत्येक तालुक्यातून दहा युवकांची सोशल मीडिया महामित्र म्हणून
निवड केली जाणार आहे. त्यांना जिल्हास्तरावर समाज माध्यमांच्या सदुपयोगाबाबत
गटचर्चेसाठी पाचारण केले जाणार आहे. जिल्हास्तरावरील कार्यक्रम 5 ते 17 मार्च या
कालावधीत होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, अनुलोम सदस्य, समाजातील प्रतिष्ठीत
यांच्यासमवेत ही गटचर्चा आयोजित करण्यात येईल. चर्चेअंती प्रत्येक तालुक्यातून एका
महामित्राची राज्यस्तरीय निवड केली जाणार आहे त्यासाठी 1 ते 18 फेब्रुवारी पर्यंत
युवकांना नोंदणी करता येणार आहे.
या
उपक्रमातील सर्व सहभागींना मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे डिजीटल प्रमाणपत्र
देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सहभागींना जिल्हास्तरीय मान्यवरांची भेट वस्तू,
लोकराज्य वार्षिक वर्गणी, महाराष्ट्र वार्षिकी पुस्तक तसेच जिल्हाधिकारी किंवा मुख्य
कार्यकारी अधिकारी यांचे प्रशस्तीपत्र व फोटो, राज्यस्तरासाठी निवड झालेल्यांना
मुंबईत जाण्यासाठी निमंत्रण, मान्यवरांसोबत सेल्फी कॉफी, आपले विचार मांडण्याची
संधी मुख्यमंत्री यांचेसमवेत फोटो, पारितोषिक व अन्य भेटवस्तू देण्यात येणार आहे.
या संधीचा अधिकाधिक युवकांनी लाभ घेवुन सोशल मीडिया महामित्र म्हणून पारितोषिक
पटकावावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागातर्फे करण्यात आले आहे.
0 0 0 0
No comments:
Post a Comment