जळगाव, दि. 14 - उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित आणि संख्याशास्त्र (विज्ञान) या
विषयांच्या सरावासाठी मंडळाने इयत्ता 11 वी साठी नमुना प्रश्नपेढी तयार केलेली
आहे. उद्दिष्टानुसार व प्रश्न प्रकारांनुसार गुणविभागणी तसेच पाठांनुसार
गुणविभागणी मंडळाच्या शिक्षण संक्रमण अंकात व मंडळाच्या वेबसाईटवर प्रकाशित
करण्यात आलेली आहे. राज्याच्या विविध भागातील शिक्षकांनी अभ्यासपूर्ण व वेगवेगळ्या
प्रकारचे प्रश्न तयार केले आहे. या प्रश्नांचे तज्ज्ञांमार्फत परिक्षण केल्यानंतर
ते प्रश्न या प्रश्नपेढीत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. ही प्रश्नपेढी नमुना
दाखल तयार करण्यात आलेली असून यातीलच प्रश्न परीक्षेत विचारले जातीलच असे नाही. इयत्ता
12 वीच्या बदललेल्या मूल्यमापन योजनेवर आधारित प्रश्नपेढी लवकरच उपलब्ध करुन
देण्यात येणार आहे. ही प्रश्नपेढी राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अशी माहिती कृष्णकुमार
पाटील, सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी दिली आहे.
इयत्ता 11 वी व 12 वीचा अभ्यासक्रम क्रमश:
शैक्षणिक वर्ष 2011-12 व 2012-13 पासून उच्चीकृत करण्यात आलेला होता. त्यावेळी
शासन मान्यतेनुसार सुधारीत मुल्यमापन योजना कार्यान्वीत करण्यात आलेली होती. परंतु
आता जवळपास सर्वच विद्यार्थी वेगवेगळया व्यवसाय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा
देत आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे राहू नये व त्यांची चांगली तयारी
होण्याच्या दृष्टीने देशपातळीवर प्रश्नपत्रिका आराखडा सारखाच असावा. यादृष्टीने
कॉब्सेकडून प्राप्त सूचनांनुसार विज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका आराखड्यात बदल
करण्यात आलेला आहे. हा बदल शासन मान्यतेने इयत्ता 11 वी साठी शैक्षणिक वर्ष
2017-18 व इ. 12 वी साठी शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून सुरु होत आहे. त्यासाठी
राज्य मंडळामार्फत व विभागीय मंडळामार्फत
इयत्ता 11 वीच्या मूल्यमापन योजनेत झालेला बदल अवगत करुन देण्यासाठी विषयाप्रमाणे
मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व विषय शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेल्या
होत्या. त्याचबरोबर या विषयातील झालेल्या बदलांबाबतचे परिपत्रक शिक्षण संक्रमण व
मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेले आहे. इयत्ता 11 वीच्या या विषयांची नमुना
प्रश्नपत्रिका व नमुना उत्तरपत्रिका सुध्दा संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.
या प्रश्नपेढीची उपयुक्तता परीक्षेतील सर्व
प्रकारच्या प्रश्न प्रकारांबाबत विद्यार्थ्यांना पूर्ण कल्पना येईल. प्रश्नपत्रिका आराखड्याबाबतची भिती व गोंधळ विद्यार्थ्यांच्या मनातून जाईल.
प्रश्न सोडविण्याचा विद्यार्थ्यांना भरपूर सराव होईल. शिक्षकांना नवनवीन प्रश्न
तयार करण्याची कल्पना येईल. विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वाढणार आहे.
प्रश्नपेढी अधिक समृध्द व
निर्दोष होण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याकडून मंडळास
सूचना प्राप्त झाल्यास त्याचे स्वागत आहे. असेही सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी
प्रसिध्दीपत्रकात म्हटले अहे.
000
No comments:
Post a Comment