जळगाव,दि.9- जळगाव
शहर महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळ्याबाबत मा. उच्च
न्यायालय येथे जनहित याचीका 119/2015 यात निर्णय होऊन मा. न्यायालयाने विहित
मुदतीत गाळे ताब्यात घेण्याचे आदेश पारित केलेले होते. सदर निकाला विरुद्ध
पुर्नविलोकन याचिका (रिव्हुयु पिटीशन) गाळेधारकांना मा. उच्च न्यायालय येथे दाखल
केलेला होती. सदर याचिका साधारण 350 गाळेधारकांनी दाखल केलेली होती. यात महात्मा
फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, जुने बिजे मार्केट व इतर मार्केट मधील
गाळेधारक होते.
सदर
पुर्नविलोकन याचिका (रिव्हुयु पिटीशन) ही आज मा. न्यायाधिश श्री. एस.व्ही गंगापूर
वाला व श्री. मंगेश पाटील यांचे न्यायासना समोर सुनावणीस होती. सदर याचिका या मा.
उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेल्या आहेत. याचिकेचे कामकाज दरम्यान याचिका कर्ते
यांनी मा. न्यायालयास भाडे भरले असल्याबाबत युक्तीवाद करण्यात आला. मात्र दिलेल्या
बिलांप्रमाणे भाडे थकबाकी पुर्ण भरलेली
नसल्याने , यापुर्वी मा. सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिकेतील निकाल हा
न्यायोचित ठरविलेला असल्याने मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांनी आज
दि. 9 फेब्रुवारी 2018 रोजी सर्व पुर्नविलोकन याचिका (रिव्हुयु पिटीशन) रद्द बाबत
ठरविलेल्या आहेत.
००००
No comments:
Post a Comment