Thursday, 31 October 2019

तंबाखू नियंत्रण समितीची त्रैमासिक सभा संपन्न किशोरवयीन मुलांना तंबाखूजन्य व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे


        



        जळगाव, दि. 31 - तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन समाजासाठी घातक असल्याने त्याचे निर्मुलन आणि उच्चाटन होण्याकरीता किशोरवयीन मुलांना तंबाखूजन्य व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.
            तंबाखू नियंत्रण समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये तंबाखू किंवा तत्संबंधी पदार्थांच्या सेवनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याचा प्रचार व प्रसार करण्याच्या सुचना आरोग्य, शिक्षण तसेच सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना केल्यात.
            या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. पाटोडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. तडवी, महिला व बालविकास अधिकारी श्री. परदेशी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी, जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदि उपस्थित होते.
            जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी तंबाखू नियंत्रण समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात तंबाखू नियंत्रणाच्या कामाचा सविस्तर आढावा सादर करतांना 12 ते 17 वयोगटातील किशोरवयीन मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रामुख्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती, शाळा महाविद्यालय परिसराच्या 100 मीटरपर्यंत अशा कुठल्याही वस्तु विकल्या जाणार नाही याची खबरदारी घेणेबाबतत सूचना केल्यात.
            बैठकीस उपस्थित सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच शिक्षण खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा सादर केला.  तर काहींनी आवश्यक सूचना मांडल्या. यावेळी शंका व अडचणींचे निरसनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. यांनी केले.
000

लसीकरण मोहिम अखंडीतपणे कार्यरत रहावी - जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे


            



          जळगाव, दि. 31 - बालके, महिला व नागरिकांना कोणत्याही आजारांची बाधा होवू नये. याकरीता लसीकरण मोहिम ही ठरावित कालावधीपुरती मर्यादित न ठेवता ती अविरतपणे सुरू रहाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नियमित लसीकरण बळकटीकरण कार्यक्रम-2019 अंतर्गत टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. पाटोडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. तडवी, महिला व बालविकास अधिकारी श्री. परदेशी, जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभगाचे अधिकारी, प्रतिनिधी, जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदिंसह इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
   लसीकरणातून सर्व बालके सर्व रोगमुक्त होण्यासाठी लसीकरण ही एखाद्या ठराविक कालावधीत राबवायची योजना न राहता ती मोहिम अखंडीतपणे सुरू ठेवून सर्व
            जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे लसीकरणाची मोहिम राबवून आपण आवश्यक ती कार्यवाही वेळेत करतो. त्याचप्रमाणे शासकीय रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम व समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करून केल्यास आपल्याला त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. याकीरता शासकीय रुग्णसेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील नागरीकांचा विचार करुन गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रसुती व इतर शस्त्रक्रियांचा लाभ देण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. रुग्णांना आवश्यक औषधी शासकीय रुग्णालयातूनच उपलब्ध व्हाव्यात, जेणेकरून रूग्णांना बाहेरून महागडी औषधी विकत घेण्याची वेळ येणार नाही. पर्यायाने अधिकाधिक रूग्ण चांगल्याप्रकारे शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घेवू शकतील. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी समाजहितास हितास प्राधान्य देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले.
            आरोग्य सेवा पुरवित असताना समाजातील अनेक उपेक्षित घटक नेहमी एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतरीत होत असतात. अशा लोकांच्या बालकांच्या आरोग्याविषयी प्रशासनाने सकारात्मक असले पहिजे. याकीरता संबंधित यंत्रणांनी गावपातळीपासून सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक, आरोग्यसेवक अशा गाव पातळीवर काम करणाऱ्या प्रशासनातील घटकांकडून संबंधित स्थलांतरीत कुटुबियांची माहिती घेवून त्या कुटुंबांना आरोग्यसेवा पुरविल्या पाहिजेत. जेणेकरुन आपण खऱ्या अर्थाने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पुरवून निरोगी समाज निर्माण करण्यास हातभार लावू शकू असेही डॉ. ढाकणे यांनी शेवटी सांगितले.
                  प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटोड यांनी लसीकरण व आरोग्य विषयक राबवित असलेल्या योजना आणि त्यांची प्रगती या विषयी सविस्तर लेखा-जोखा सादर केला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरीकांना आरोग्य विषयक सेवा अविरतपणे विनाविलंब देण्याच्या सूचना केल्यात.
000

स्व. इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन


             




         जळगाव, दि. 31 - भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने या नेत्यांना जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दोघांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.
        याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी प्रमोद बोरोले, महेश पत्की, तहसिलदार प्रशांत कुलकर्णी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
            याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसानिमित्ताने राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षेची शपथ दिली.
000

Wednesday, 30 October 2019

राष्ट्रीय एकता दौड मध्ये धावले अवघे जळगावकर























जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) :- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील खान्देश मॉल - नेहरू चौक – टॉवर चौक - चित्रा चौक – नेरी नाका – पांडे डेअरी चौक मार्गे स्वातंत्र्य चौक आणि तेथून बसस्टँड समोरून जावून शिवाजी चौक नंतर खान्देश मॉल येथे रॅलीची सांगता झाली. या रॅलीत रनर्स ग्रुपचे सदस्य, शहरातील खेळाडू, विविध सामाजिक संस्थाचे पदाधिकारी,  अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. महानगरपालिकचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील,  जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, जळगाव रनर्स ग्रुपचे डॉ. विवेक पाटील, डॉ. उमेश पाटील, डॉ. प्रशांत देशमुख, समाजकार्य महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह तहसिलदार वैशाली हिंगे, तहसिलदार प्रशांत कुलकर्णी, मनपाचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते, पोलीस उपविभागीय अधिकारी डाॅ. निलाभ रोहण, पोलीस निरीक्षक सर्वश्री गोरक्ष शिरसाठ, युनुसखान पठाण, बापू रोहम तसेच मनपा, गृहरक्षक दल, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संखेने संख्येने सहभागी झाले होते.

एकता दौडच्या सुरूवातीस योगाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.  जिल्हाधिकारी डाॅ. ढाकणे यांनी उपस्थितांना एकात्मतेची शपथ दिली.
0000

राष्ट्रीय एकात्मतेसाठी आज रन फॉर युनिटी’ चे आयोजन जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन


         




          जळगाव, दि. 30 :-  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.  या दिनानिमित्त समाजात एकात्मता वाढीस लागावी. या उद्देशाने जळगाव जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, गृहरक्षक दल, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव रनर्स ग्रुप व महानगर पालिकेच्यावतीने दि. 31 ऑक्टोबर रोजी ‘रन फॉर युनिटी’ चे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय एकात्मता दौडमध्ये जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था, व्यापारी असोसिएशन, क्रीडा संघटना, खेळाडू तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवावा.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एकता दौड (Run For Unity ) च्या पूर्वतयारी बैठकीत केले.
            या बैठकीस  जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील,  प्र. निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यु. बी. तासखेडकर, जळगाव रनर्स ग्रुपचे डॉ. विवेक पाटील, डॉ.उमेश पाटील, डॉ. प्रशांत देशमुख, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील डॉ. प्रा. मोहिनी उपासनी, तहसिलदार वैशाली हिंगे, तहसिलदार प्रशांत कुलकर्णी, मनपाचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते, पोलीस निरीक्षक  सर्वश्री गोरक्ष शिरसाठ, युनुसखान पठाण, बापू रोहम तसेच मनपा, गृहरक्षक दल, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
            राष्ट्रीय एकात्मतेसाठी आयोजित या  दौडच्या अगोदर सकाळी 6 ते 6.30 वाजेदरम्यान खान्देश मॉल येथे जळगाव रनर्स ग्रुपतर्फे दौडमध्ये सर्व सहभागींसाठी योगाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी 6.30 वाजता पोलीस बँडसह दौडमध्ये सर्व सहभागी सामील होतील  आणि तद्नंतर खान्देश मॉल येथून एकता दौड सुरू होईल. शहरातील नेहरू चौक – टॉवर चौक - चित्रा चौक – नेरीनाका - मार्गे स्वातंत्र्य चौक आणि तेथून बसस्टँड समोरून जावून खान्देश मॉल येथे दौडची सांगता होईल.
            एकता दौड दरम्यान राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षी  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनातर्फे रन फॉर युनिटी मध्ये सर्व सहभागींसाठी टी शर्ट   पुरविण्यात येणार असून टी शर्ट परिधान करून रनर्स या दौडमध्ये धावणार आहे.
            या दौडमध्ये शासकीय  अधिकारी, खेळाडू, विविध क्रीडा संघटनाचे प्रतिनिधी, जळगाव रनर्स ग्रुपचे पदाधिकारी, प्रतिनिधी सोबतच विविध स्वयंसेवी संघटना, व्यापारी असोसिएशन, डॉक्टर, युवक, युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.                                                            00000