जळगाव, दि. 19 - महाराष्ट्र
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने राज्यात सध्या लोकशाहीचा महाउत्सव सुरु आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या
निवडणूकीत जास्तीत जास्त मतदारांनी उत्सफुर्तेपणे सहभागी होऊन मतदान करावे.
याकीरता मा. भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य व जळगाव
जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाचा एक
भाग म्हणून आज जळगाव जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक
शाळांमध्ये प्रभातफेरी काढून जनजागृती केली. या प्रभातफेरीत जिल्ह्यातील साडेसात
लाख विद्यार्थी सहभागी झाले.
यावेळी जिल्ह्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या
सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी मतदारांमध्ये जनजागृतीसाठी कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा, मुख्याध्यापक,
शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात रॅलीचे
आयोजन करून जनतेत मतदानासंदर्भात माहिती देवून मतदानाची अधिकाधिक टक्केवारी
वाढविण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर कलापथक, पथनाटयाच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांनी मतदारांना बाळगा लोकशाहीचा अभिमान, चला करु मतदान, बोटावरील शाई,
बळकट करील लोकशाही, चला सोडा सारे कामधाम, पहिले करु मतदान, सण आनंदाचा, सण
उत्सवाचा, सण मतदानाचा, आपल्या एका मताचे महत्व जाणा, निर्भयपणे मतदान करा.
यासारख्या अनेक घोषणांनी विद्यार्थ्यांनी आसमांत दणाणून सोडला.
या उपक्रमातंर्गत आज जिल्ह्यातील 2343 प्राथमिक शाळांमधील 3
लाख 13 हाजर 508 विद्यार्थी,
708 माध्यमिक शाळांमधील 3 लाख 50 हजार 938 विद्यार्थी, 95 उच्च
माध्यमिक शाळांमधील 57 हजार 823 विद्यार्थी तर 24 हजार 950 शिक्षक, आंगणवाडी सेविका,
बचतगट, आशावर्कर असे एकूण 7 लाख 47 हजार 119 विद्यार्थी व इतर नागरीक सहभागी झाले
होते.
या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन नशिराबाद, ता. जळगाव येथे करण्यात आले
होते. याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकार दिगंबर लोखंडे, स्वीप नोडल अधिकारी बी.
जे. पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी, तालुका
आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण, विस्तार अधिकारी फिरोज पठाण, यांसह इतर अनेक मान्यवर
उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment