जळगाव, दि. 31 - बालके, महिला व
नागरिकांना कोणत्याही आजारांची बाधा होवू नये. याकरीता लसीकरण मोहिम ही ठरावित
कालावधीपुरती मर्यादित न ठेवता ती अविरतपणे सुरू रहाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन
जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नियमित
लसीकरण बळकटीकरण कार्यक्रम-2019 अंतर्गत टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक डॉ.
ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
बी. एन. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. डी. एस. पाटोडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. तडवी, महिला
व बालविकास अधिकारी श्री. परदेशी, जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी,
माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभगाचे अधिकारी, प्रतिनिधी, जिल्ह्यातील नगरपालिकांचे
मुख्याधिकारी आदिंसह इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
लसीकरणातून सर्व
बालके सर्व रोगमुक्त होण्यासाठी लसीकरण ही एखाद्या ठराविक कालावधीत राबवायची योजना
न राहता ती मोहिम अखंडीतपणे सुरू ठेवून सर्व
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले
की, ज्याप्रमाणे लसीकरणाची मोहिम राबवून आपण आवश्यक ती कार्यवाही वेळेत करतो.
त्याचप्रमाणे शासकीय रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम व समाजातील शेवटच्या घटकाचा
विचार करून केल्यास आपल्याला त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. याकीरता शासकीय
रुग्णसेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही
त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील नागरीकांचा विचार करुन गावपातळीवरील प्राथमिक
आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रसुती व इतर शस्त्रक्रियांचा लाभ देण्यासाठी
उपाययोजना राबवाव्यात. रुग्णांना आवश्यक औषधी शासकीय रुग्णालयातूनच उपलब्ध
व्हाव्यात, जेणेकरून रूग्णांना बाहेरून महागडी औषधी विकत घेण्याची वेळ येणार नाही.
पर्यायाने अधिकाधिक रूग्ण चांगल्याप्रकारे शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घेवू शकतील.
वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी समाजहितास हितास प्राधान्य देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी
डॉ. ढाकणे यांनी केले.
आरोग्य सेवा पुरवित असताना समाजातील
अनेक उपेक्षित घटक नेहमी एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतरीत होत असतात. अशा
लोकांच्या बालकांच्या आरोग्याविषयी प्रशासनाने सकारात्मक असले पहिजे. याकीरता
संबंधित यंत्रणांनी गावपातळीपासून सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक, आरोग्यसेवक
अशा गाव पातळीवर काम करणाऱ्या प्रशासनातील घटकांकडून संबंधित स्थलांतरीत
कुटुबियांची माहिती घेवून त्या कुटुंबांना आरोग्यसेवा पुरविल्या पाहिजेत. जेणेकरुन
आपण खऱ्या अर्थाने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पुरवून निरोगी समाज
निर्माण करण्यास हातभार लावू शकू असेही डॉ. ढाकणे यांनी शेवटी सांगितले.
प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटोड यांनी लसीकरण व आरोग्य विषयक
राबवित असलेल्या योजना आणि त्यांची प्रगती या विषयी सविस्तर लेखा-जोखा सादर केला.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी,
कर्मचाऱ्यांनी नागरीकांना आरोग्य विषयक सेवा अविरतपणे विनाविलंब देण्याच्या सूचना
केल्यात.
000
No comments:
Post a Comment