जळगाव,
दि. 1 :- संपूर्ण राज्य तंबाखू मुक्त करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय तंबाखू
नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी
होणेकरीता तंबाखू, तंबाखूचे दुष्परीणामाबाबत तसेच ई- सिगारेट बंदी कायदाबाबत
जनजागृती करणे गरजेचे आहे.
याकरीता
2 ऑक्टोबर, 2019 रोजी ‘‘ महात्मा गांधी
जयंती निमित्त’’ ग्रामीण भागात होणाऱ्या ग्रामसभेत तसेच शहरी व ग्रामीण भागातील
शाळा, महाविद्यालयांमध्ये तंबाखुच्या दुष्परीणामाबाबत जनजागृती व तंबाखुमूक्तीची
तसेच E-Cigaratte बंदीबाबतची शपथ घेण्याचे आवाहन आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान
संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
000
No comments:
Post a Comment