Tuesday, 1 October 2019

ग्रामसभांमध्ये आज तंबाखू मुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन


            जळगाव, दि. 1 :- संपूर्ण राज्य तंबाखू मुक्त करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होणेकरीता तंबाखू, तंबाखूचे दुष्परीणामाबाबत तसेच ई- सिगारेट बंदी कायदाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.
            याकरीता 2 ऑक्टोबर, 2019 रोजी  ‘‘ महात्मा गांधी जयंती निमित्त’’ ग्रामीण भागात होणाऱ्या ग्रामसभेत तसेच शहरी व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांमध्ये तंबाखुच्या दुष्परीणामाबाबत जनजागृती व तंबाखुमूक्तीची तसेच E-Cigaratte बंदीबाबतची शपथ घेण्याचे आवाहन आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:

Post a Comment