जळगाव
दि. 21 :- जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस
स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपले कर्तव्य बजावत असतांना हौतात्म्य
पत्करणाऱ्या देशातील सर्वच पोलीस दलातील अधिकारी आणि जवानांना आदरांजली वाहण्यात
आली. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस अधिक्षक
कार्यालयाजवळील हुतात्मा स्मारक येथे शहिदांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली
वाहण्यात आली.
सर्व
प्रथम जिल्हाधिकारी यांनी या दिनाचे
महत्त्व सांगुन शोक संदेशाचे वाचन केले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले,
अपर पोलीस अधीक्षक श्रीमती.भाग्यश्री नवटके यांनीही हुतात्मा स्मारक येथे शहिदांना
पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.
यावेळी
जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. भाग्यश्री नवटके
यांनी शहीद कुटूंबीयांची भेट घेतली.
दि.
1 सप्टेबर 2018 ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत
संपुर्ण भारतात एकुण 292
पोलीस अधिकारी व
पोलीस जवान कर्तव्य
बजावतांना शहीद झाले.
त्यात महाराष्ट्रातील तीन पोलीस
जवानांनी प्राणाची आहुती दिली आहे.
यावेळी वीरगती प्राप्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे सहायक.पो.नि..निता कायटे
यांनी वाचन केले. याप्रसंगी परेडने
जनरल सॅल्यूट देऊन तीन वेळा बंदुच्या तीन
फैरी झाडून हुतात्म्यांना सलामी दिली.
नंतर बिगुलर्सने ' लास्ट पोस्ट ' आणि '
राऊज ' वाजविले.
सदर
कार्यक्रमाप्रसंगी पोलीस उप अधिक्षक संजय देशमुख, पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल,
कार्यालय अधीक्षक विलास पवार, पो.नि. पंकज पवार, राखीव पोलीस निरीक्षक सुभाष कावरे
रा.पो. उप. निरी. गोरख शिरसाठ, मदन चव्हाण, भरत चौधरी इत्यादी अधिकारी व कर्मचारी
तसेच जळगाव शहरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
पोलीस स्मृतीदिन
संचलनाचे सुत्रसंचालन स.फौ.मिलींद केदार यांनी केले तसेच सदर कार्यक्रम यशस्वी
करणे करीता रा.पो. नि. सुभाष कावरे, रा.पो.उप.निरी. गोरख शिरसाठ, मदन चव्हाण, भरत
चौधरी, लिपीक - महेश केदारे, लिपीक - हर्षल बयास, पोलीस हेडकॉनस्टेबल जयंत चौधरी
यांनी परिश्रम घेतले.
00000
No comments:
Post a Comment