नाशिक (विमाका) दि.18 : माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी
वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या
जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी 1 जानेवारी 2019 ते 31
डिसेंबर 2019 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन, छायाचित्रे, वृत्तकथा
यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत 31
जानेवारी 2020 आहे.
अर्जाचे
नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या स्पर्धेत नाशिक
विभागातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक विभाग
उपसंचालक (माहिती) डॉ. किरण मोघे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment