जळगाव.दि.7 :- वनशेती खालील क्षेत्रात वाढ करून एकमेकांना
पुरक व एकात्मिक पद्धतीने पिकांची व पशुधनाची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय
शाश्वत शेती अभियांतर्गत वनशेती उपअभियान राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात सन
2019-2020 मध्ये सदरची योजना राबविण्यात येत असून वनिके रोपे जसे साग, बांबु, शेवगा,
आवळा, सिताफळ, चिंच, बोर, जांभुळ इत्यादि रोपांची शासकीय अथवा खासगी
रोपवाटींकांमधून उचल करून बांधावरील लागवड कमी घनतेची लागवड, जास्त घनतेची लागवड
करता येईल.
सदर अभियानासाठी केंद्र शासनाने बाबनिहाय मंजूर केलेल्या
मापदंडाच्या 50 टक्के रक्कम शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष लागवडीनुसार
देय राहील. अनुदान हे 40:20:20:20 या प्रमाणात एकूण चार वर्षात देण्यात येईल. तरी
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आप-आपल्या तालुका कृषी अधिकारी, कृषी
पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी
अधिकारी, जळगाव संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
000000
No comments:
Post a Comment