जळगाव,
दि. 8 - रेशीम शेतीच्या प्रसारासाठी तसेच रेशीम शेतीची माहिती देण्यासाठी व नवीन
तुती लागवडीकरहीता शेतक-यांनी नोंदणी करावी. यासाठी जिल्ह्यात 7 ते 21 जानेवारी दरम्यान
महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे.
या
अभियानांतर्गत रेशीम शेतीची माहिती देणारा रेशीम रथ जिल्ह्यातील गावांमध्ये फिरविण्यात
येणार आहे. या रथाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते
जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आहे. या उद्घाटन
समारंभाप्रसंगी जळगाव वन विभागाचे उप वनसरंक्षक दिंगबर पगार, उपजिल्हाधिकारी प्रसाद
मते, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी चंद्रकांत बडगुजर, आर.
एस. सांगळे यांचेसह इतर अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
केंद्र
शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार अधिनियमातंर्गत रेशीम शेतीसाठी
अल्पभुधारक शेतक-यांना मागील वर्षात 2 लाख 95 हजार 150 रुपये इतके अनुदान देण्यात
आलेले आहे. केंद्र शासनाच्या या योजनेमध्ये शेतक-यांना रेशीम कीटक संगोपनगृह
बांधण्यासाठी मजुरी 43 हजार 878 रुपये व साहित्य खरेदीसाठी 49 हजार 50 रुपये असे
एकुण 92 हजार 928 रुपये मिळणार आहेत. तसेच राज्य शासनाच्या नानासाहेब देशमुख कृषि
संजीवनी प्रकल्प योजनेतंर्गत तुती लागवडीसाठी शेतक-यांना 37 हजार 500 रुपये तर
साहित्यासाठी 56 हजार 250 व 1 हजार 500 वर्ग फुट आकाराचे संगोपन गृह बांधणीसाठी 1
लाख 26 हजार 479 रुपये अनुदान राज्यात कृषि विभागामार्फत देण्यात येते. केंद्र व
राज्याच्या या योजनेत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील 460 गावांतील शेतक-यांना या
योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेता येणार आहे. अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती
प्रवर्गासाठी या योजनेत 90 टक्के अनुदान मिळणार आहे.
जिल्ह्यात
रेशीम शेतीच्या प्रसारासाठी, माहिती देण्यासाठी तसेच नवीन तुती लागवडसाठी शेतक-यांनी
नोंदणी करावी. याकरीता जळगांव जिल्ह्यात 7 ते 21 जानेवारी दरम्यान महारेशीम अभियान
राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी केंद्र व राज्य
शासनाच्या रेशीम विकास प्रकल्प योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. चंद्रकांत
बडगुजर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जळगांव यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment