Thursday, 30 June 2022

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शेततळे उभारणे बाबत बैठक संपन्न

        जळगाव, दि.30 (जिमाका वृत्तसेवा) :जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 29 जून 2022 रोजी वाघुर उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने शेततळे उभारणे बाबतची बैठक संपन्न झाली. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियता  य.का. भदाणे,  कृषी विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर,  वाघुर प्रकल्पाचे अभियंता विनोद पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.

           वाघुर प्रकल्पाच्या सातव्या सुधारीत प्रशासकीय मान्यता अहवाला नुसार जामनेर तालुक्यातील वाघुर प्रकल्पाच्या 29 गांवातील लाभक्षेत्रामध्ये, जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने एकुण 2020 शेततळे बांधणे प्रस्तावीत आहेत. शेततळे तयार करणे व शेततळयातुन सुक्ष्म सिंचन पाणी वापराबाबत शेतकऱ्यांसोबत करार करण्याची कार्यवाही प्रगतीत आहे.

          सदरची कामे चालु वर्षात सुरु करण्याचे नियोजन आहे. शेततळयाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना हवे त्यावेळी पाणी मिळणार आहे. त्यामुळे शेती उत्पादन वाढीस मदत होईल. तसेच शेततळयामध्ये मत्सउत्पादन शेततळयाच्या बांधावर फलवृक्ष लागवड व सौर ऊर्जा निर्मिती अशा विविध बांबीचा अंतर्भाव करुन शेतकऱ्यांची आर्थीक स्थिती उंचावण्यासाठी मदत होणार आहे.

           भविष्यातील पाण्याची काटकसरीचा वापर होण्यासाठी सदर भागात सुक्ष्म सिंचनाला चालना देण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना एवढया मोठया प्रमाणात एकाच वेळी 10,100 हेक्टर वर राज्यात प्रथमच प्रयोगीक तत्वावर शेततळे उभारण्याचे नियोजन आहे.

साधारण 5 हेक्टर क्षेत्रात 1 शेततळे ( 16 गुंठे आकराचे) त्यामध्ये 27 लक्ष लिटर पाणी साठा व तो दर 25 दिवसांनी शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे शेततळे भरुन देण्याचे नियोजन राहणार आहे. असे आवाहन अधिीक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, य.का. भदाणे, यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.                                                                                    

                                                      000000

भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर व राज्यस्तरावर पत्र लेखन स्पर्धा

         जळगाव, दि.30 (जिमाका वृत्तसेवा) :सदर पत्र लेखाना या विषय - Vision for India 2047 म्हणजेच 2047 मधील भारत असा आहे. सदर स्पर्धेच्या नियम व अटी खालील प्रमाणे आहेत

           1)पत्र कोणत्याही भाषेमधून लिहिता येइल,  सदर पत्रलेखन स्पर्धेचा  कालावधी 01:जुलै, 2022 ते 31.ऑक्टोबर, 2022 असा आहे,  2) ही पत्र लेखन स्पर्धा वय वर्ष 18 पर्यंत एक गट व वय वर्ष 18 च्या वर दुसरा गट अशा दोन गटात विभागलेली आहे. पत्राच्या शेवटी स्पर्धकानी "दिनांक  1 जानेवारी, 2022 रोजी माझे वय 18 पेक्षा कमी / जास्त आहे "असा दाखला देणे व सही करणे गरजेचे आहे. तसेच आपले नाव पत्ता व वयाचा उल्लेख असावा.

3.सदर पत्र आतर्देशिय पत्र अथवा A 4 साइज पेपर वर लिहिता येऊ शकते पाकिटातून पत्र पाठवण्याची शब्द मर्यादा 1000 व अंतर्देशीय पत्रासाठी 500 शब्दाची आहे. सदरचे पत्र मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या नावाने लिहून डाकघरा मार्फत लावलेल्या विशेष टपाल पेटीत टाकावयाचे आहे. पत्र पाठविण्याची शेवटची दिनांक 31.ऑक्टोंबर, 2022 असून त्या नंतर पाठवलेल्या पत्राचा पत्र लेखन स्पर्धेमध्ये समावेश करण्यात येणार नाही. फक्त हस्त लिखित पत्रेच स्वीकारली जातील याची नोंद घ्यावी.

4. राज्य स्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे 25 हजार रुपये, दहा हजार रुपये व पाच हजार  रुपये राज्य स्तरावर निवडलेल्या प्रत्येक गटातून निवडलेल्या तीन उत्कृष्ट पत्राला राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात येईल व राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे 50 हजार रुपये, 25 हजार रुपये, दहा हजार रुपये चे पारितोषक देण्यात येईल.

          तरी जास्तीत जास्त संख्येने जनतेने आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन डाक अधिक्षक बी. व्ही. चव्हाण, जळगाव यानी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. अधिक महिती साठी 0257-2224288 या नंबर वर संपर्क साधावा.

                                                       00000

1 ते 7 जुलै 2022 दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव- इंडिया @75 मोहिमेअंतर्गत 3 रा "पीक विमा सप्ताह" साजरा करण्यात येत आहे

        जळगाव, दि.30 (जिमाका वृत्तसेवा) :दिनाक  1 ते 7 जुलै 2022 दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव- इंडिया @75 मोहिमेअंतर्गत 3 रा  पीक विमा सप्ताह  साजरा करण्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (मृग बहार) प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसुचित मंडळमध्ये महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरून अधिसुचित पिकांना राबविण्यात येत आहे.

          सदर मोहिमेमध्ये पिक विमा कंपन्या, राष्ट्रीयकृत सहकारी बँका, प्राथमिक कृषि को - ऑफरेटिव्ह सोसायटी, आपले सरकार केंद्र, आत्मा मधील कर्मचारी, पंचायती राज संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी संघटना आणि खते / बियाणे विक्रेते इत्यादी यांनी या सप्ताहामध्ये सहभागी व्हावे, दिनांक 1 जुलै 2022 रोजी पीक विमा सप्ताहाच्या प्रारंभाच्या दिवशी जिल्हयातील खासदार/आमदार अधिकारी /पदाधिकारी इतर मान्यवरांनी सहभाग घ्यावा.

          प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 22-23 या वर्षाकरिता मृग बहाराकरिता लागू करण्यात आली आहे.. सदर योजनेमध्ये जळगाव जिल्ह्यासाठी मृग बहार करिता चिकू, डाळीबं, पेरु, मोसंबी, लिंबू, सिताफळ या फळपिकांसाठी महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरून ही योजना फळपिकासाठी अधिसूचित मंडळामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई मार्फत राबविण्यात येत आहे.. योजनेमध्ये शेतक-यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत डाळींब पिकाकरीता 14  जुलै, 2022 सिताफळ पिकाकरीता 31 जुलै, 2022 आहे.

          तसेच प्रधानमंत्री  पिक विमा योजना सन 22-23 खरीप हंगामाकरिता लागू करण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये जळगाव जिल्ह्यासाठी खरीप हंगामाकरीता  बाजरी, ज्वारी, मका, उडीद, मूग, तुर, तीळ, भुईमूग, सोयाबीन कापूस या पिकासाठी महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरून ही योजना खरीप पिकासाठी अधिसुचित मंडळामध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये शेतक-यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2022 आहे.

          जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मृग बहाराकरिता प्रधानमंत्री पिक विमा योजने मध्ये अधिसुचित महसूल मंडळस्तरावर अधिसुचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे.. तरी जिल्हयातील जास्तीत-जास्त शेतकन्यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे" असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  संभाजी ठाकुर  यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँक, मंडळ कृषि अधिकारी कार्यालय (सर्व), तालुका कृषि अधिकारी कार्यालय     (सर्व तालुके),, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कार्यालय, जळगाव, आकाशवाणी शेजारी, प्रशासकीय इमारत येथे संपर्क साधावा. एग्रीकल्चर इंन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मुंबई  क्षेत्रिाय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वा माळा, दलाल स्ट्रीट फोर्ट, मुंबई -400023, टोल फ्री नंबर-1800 419 5004, -मेल  pilvima@aicofindia.com.  जिल्हा प्रतिनिधी, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मो. क्रं. 9595554473  येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००

भारतीय डाक विभागात डाक जीवन बिमा अभिकर्ता या पदासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड

        जळगाव, दि.३० (जिमाका वृत्तसेवा) :भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजने अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे अभिकत्यांची (Direct Agent) नेमणूक करण्यात येत आहे. त्यासाठी जळगाव जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सोमवार दिनांक 11 जुलै 2022 रोजी सकाळी 10:00 से 5:00 वाजेपर्यंत सहाय्यक डाक अधीक्षक जळगाव उपविभाग जळगाव, मुख्य पोस्ट ऑफिस जळगाव मागील बाजू या ठिकाणी 10 वी, 12 वी च्या शैक्षणिक कागदपत्रासह व फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड सहित मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात येते.

          पात्रता व अटी.१) वय मर्यादा वय वर्ष 18 ते 50 वर्ष 2) शैक्षणिक अहर्ता - उमेदवार हा कमीत कमी 10 वी पास असणे आवश्यक आहे. 3) श्रेणी -बेरोजगार, स्वयं रोजगार, माजी जीवन विमा सल्लागार,  माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडल कर्मचारी इत्यादी कोणीही अर्ज करू शकतात. 4) उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्‌वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व परस्पर सवाद कौशल्य, जीवन विमा बाबत ज्ञान या आधारावर केली जाईल.         5) निवड झालेल्या उमेदवाराकडुन राष्ट्रीय बचत पत्र (NSC) अथवा किसान विकास पत्र (KVP) च्या स्वरूपात रुपये 5000/- सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल.

6) प्रक्षिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपाचा परवाना देण्यात येईल. नंतर IRDA ची परीक्षा पास केल्यानंतर उमेदवार कायम करण्यात येईल.7) निवड झालेल्या उमेदवारांना डाक विभागाने वेळोवेळी ठरवलेले कमिशन दिले जाईल. असे अधिक्षक डाकघर जळगाव विभाग जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

00000

आदिवासी विकास विभाग यावल येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया

           जळगाव, दि.३० (जिमाका वृत्तसेवा) : -  राज्यात विभागीय, जिल्हा तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागाव्दारे शासकीय वसतीगृह योजना कार्यान्वित आहे.

          2)विभागीय व जिल्हास्तरावर  तालुका व ग्रामीण स्तरावर इयत्ता 8 वी पासून ते 12वी पर्यन्त ( प्री मॅट्रीक पासून ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यन्त ) शिक्षण घेणा-या नविन व जुने विद्यार्थ्यानी शासकीय वस्तीगृह प्रवेशासाठी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोदणी करावयाची आहे.

   3) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत एकूण 17 आदिवासी मुला/मुलींचे शासकीय  वसतीगृह कार्यरत आहे. या सर्व वसतीगृहामध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे शैक्षणिक वर्ष सन 2022-23 करीता प्री मॅट्रीक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रवेश अर्ज www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर स्विकारण्यात येत आहे.

          4) अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यानी ( नविन व जूने) महाविद्यालय प्रवेशाच्या आधारावर विविध प्री मॅट्रीक व कनिष्ठ महाविद्यालयासाठी खालील वेळापत्रकानुसार  दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावेत.

          5) नविन व जून्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी वरील संकेतस्थळावर दिलेल्या user manual चे वाचन करून त्या आधारे अचूक अर्ज भरावा.

          6) विद्यार्थ्यानी सदर संकेत स्थळावर अर्ज भरण्याकरीता प्रथम नांदणी (registration) करावे. नावनोंदणी नंतर प्राप्त user id passward चा उपयोग करून अर्ज भरावा. अर्ज भरण्यासाठी नविन विद्यार्थ्यानी Hostel Addmission मधील New Addmission हा पर्याय काळजीपुर्वक निवडावा.

7) जे विद्यार्थी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात (जूने विद्यार्थी) प्रवेशित होते अशा  विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात देखील अर्ज भरणे आवश्यक आहे. या करीता Hostel Addmission यामध्ये Renew Hostel Addmission हा पर्याय काळजीपुर्वक निवडून पुढील अर्ज भरावा

8)जुन्या विद्यार्थ्यानी युझरआयडी व पासवर्ड मिळणेसाठी www.swayam.mahaonline.gov.in या  वेबसाईडच्या होम पेजवर forgot passward चा वापर करावा यामध्ये आवश्यक ती माहिती भरून पासवर्ड रिसेट करून घ्यावा.

 9) वसतीगृह प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याने प्रथम महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे. 10)वसतीगृहासाठी अर्ज करताना ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे (उदा.मागील वर्षी मिळालेले गुण/गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र क्रमांकासहीत. टी. सी. चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा / महाविद्यालयाचे  बोनाफाईड / प्रवेश पावती, आधारकार्ड, वडीलांचा ( पालकाचा) चालू वर्षाचा उत्पादनाचा दाखला, राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्याचे पासबुक झेरॉक्स, वैद्यकीय दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे) विद्यार्थ्यानी सोबत बाळगावीत.

 11) याबाबत अधिक माहितीसाठी आपण प्रवेश घेवू इच्छीत असलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक सन 2022-23 आदिवासी मुला/मुलीचे शासकीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक

इयत्ता / अभ्यासक्रम  - Pre-Matric (इयत्ता 8 वी ते 10 वी)    व 2) Junior College (इ.11 वी व 12 वी ) – अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक – 28 जुलै, 2022- नविन विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करणे – 1 ऑगस्ट, 2022, निवड यादीनुसार विद्यार्थ्याना प्रवेश देण्याचा कालावधी  दिनांक 4 ते 11 ऑगस्ट, 2022

           वेळापत्रकामध्ये अंशतः बदल करण्याचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल जि.जळगाव  यांना राहतील असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल  वनिता सोनवणे  यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

00000

परिवहन विभागाचा जुलै महिन्याचा तालुकानिहाय दौरा जाहिर

       जळगाव, दि.३० (जिमाका वृत्तसेवा) : - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव मार्फत जुलै महिन्याचा तालुकानिहाय मासिक दौरा आयोजित करण्यात आला असून याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.  

जुलै-2022 चे शिबीर कार्यालयाचे वेळापत्रक, दौऱ्याचे ठिकाण

 अमळनेर-पहिला व तिसरा सोमवार, जामनेर-दुसरा व चौधा बुधवार, पाचोरा-पहिला व तिसरा बुधवार, भुसावळ-पहिला, दुसरा व चौथा गुरुवार, चाळीसगाव-पहिला, व चौथा शुक्रवार, सावदा – दुसरा व चौथा मंगळवार, चोपडा - तिसरा शुक्रवार, रावेर – पहिला मंगळवार, बोदवड - दुसरा शुक्रवार,  पारोळा – दुसरा व चौथा सोमवार, एरंडोल – तिसरा मंगळवार,  मुक्ताईनगर- तिसरा गुरुवार, याप्रमाणे दौरा राहील.     

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द करण्यात येईल. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी   श्याम लोही यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये म्हटले आहे.

                                         0000