जळगाव, दि.30 (जिमाका वृत्तसेवा) : - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 29 जून 2022 रोजी वाघुर उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने शेततळे उभारणे बाबतची बैठक संपन्न झाली. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियता य.का. भदाणे, कृषी विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर, वाघुर प्रकल्पाचे अभियंता विनोद पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.
वाघुर प्रकल्पाच्या
सातव्या सुधारीत प्रशासकीय मान्यता अहवाला नुसार जामनेर तालुक्यातील वाघुर
प्रकल्पाच्या 29 गांवातील लाभक्षेत्रामध्ये, जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या
संयुक्त विद्यमानाने एकुण 2020 शेततळे बांधणे प्रस्तावीत आहेत. शेततळे तयार करणे व
शेततळयातुन सुक्ष्म सिंचन पाणी वापराबाबत शेतकऱ्यांसोबत करार करण्याची कार्यवाही
प्रगतीत आहे.
सदरची कामे चालु वर्षात सुरु करण्याचे
नियोजन आहे. शेततळयाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना हवे त्यावेळी पाणी मिळणार आहे.
त्यामुळे शेती उत्पादन वाढीस मदत होईल. तसेच शेततळयामध्ये मत्सउत्पादन शेततळयाच्या
बांधावर फलवृक्ष लागवड व सौर ऊर्जा निर्मिती अशा विविध बांबीचा अंतर्भाव करुन
शेतकऱ्यांची आर्थीक स्थिती उंचावण्यासाठी मदत होणार आहे.
भविष्यातील पाण्याची
काटकसरीचा वापर होण्यासाठी सदर भागात सुक्ष्म सिंचनाला चालना देण्याचे नियोजन आहे.
शेतकऱ्यांना एवढया मोठया प्रमाणात एकाच वेळी 10,100 हेक्टर वर राज्यात प्रथमच
प्रयोगीक तत्वावर शेततळे उभारण्याचे नियोजन आहे.
साधारण 5 हेक्टर क्षेत्रात
1 शेततळे ( 16 गुंठे आकराचे) त्यामध्ये 27 लक्ष लिटर पाणी साठा व तो दर 25
दिवसांनी शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे शेततळे भरुन देण्याचे नियोजन राहणार आहे. असे
आवाहन अधिीक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, य.का. भदाणे, यांनी एका
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
000000