जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) :- जळगाव जिल्हयात सन 2021-22 करिता प्रधानमंत्री पिक विमा योजना आयआयसी लोमबांर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत अधिसुचित क्षेत्रात राबविण्यात आलेली होती. सदर योजनेत शेतकरी हिस्सा म्हणून रु. 27.48 कोटी विमा कंपनीकडे भरण्यात आले होते. या पुर्वी खरीप पिकांसाठी मिड सिजन व स्थानिक आपत्तीसाठी विमा कंपनीकडून रु 64.95 कोटी रक्कम 93,981 शेतकऱ्यांच्या बॅक खाती जमा करण्यात आलेली आहे.
सदर
योजनेचे उत्पन्नावर आधारीत अंतिम नुकसान भरपाईची रक्कम रु. 53.80 कोटी मा.पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शासनस्तरावर प्रयत्न करुन मंजूर केलेली
आहे. सदर रक्कमेपैकी कापूस सोडून इतर खरीप पिकांची नुकसान भरपाई रु. 169 कोटी
रक्कमेचे वाटप् विमा कंपनीकडून करण्यात येत आहे. उर्वरीत कापूस पिकाची देय असलेली
नुकसान भरपाई रक्कम रु. 52.11 कोटी 48,107 शेतकऱ्यांना पालकमंत्री जळगाव यांनी
त्वरीत वाटप करण्याचे आदेश विमा कंपनीला दिलेले आहेत. असे जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी यानी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment