Thursday, 30 June 2022

1 ते 7 जुलै 2022 दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव- इंडिया @75 मोहिमेअंतर्गत 3 रा "पीक विमा सप्ताह" साजरा करण्यात येत आहे

        जळगाव, दि.30 (जिमाका वृत्तसेवा) :दिनाक  1 ते 7 जुलै 2022 दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव- इंडिया @75 मोहिमेअंतर्गत 3 रा  पीक विमा सप्ताह  साजरा करण्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (मृग बहार) प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसुचित मंडळमध्ये महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरून अधिसुचित पिकांना राबविण्यात येत आहे.

          सदर मोहिमेमध्ये पिक विमा कंपन्या, राष्ट्रीयकृत सहकारी बँका, प्राथमिक कृषि को - ऑफरेटिव्ह सोसायटी, आपले सरकार केंद्र, आत्मा मधील कर्मचारी, पंचायती राज संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी संघटना आणि खते / बियाणे विक्रेते इत्यादी यांनी या सप्ताहामध्ये सहभागी व्हावे, दिनांक 1 जुलै 2022 रोजी पीक विमा सप्ताहाच्या प्रारंभाच्या दिवशी जिल्हयातील खासदार/आमदार अधिकारी /पदाधिकारी इतर मान्यवरांनी सहभाग घ्यावा.

          प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 22-23 या वर्षाकरिता मृग बहाराकरिता लागू करण्यात आली आहे.. सदर योजनेमध्ये जळगाव जिल्ह्यासाठी मृग बहार करिता चिकू, डाळीबं, पेरु, मोसंबी, लिंबू, सिताफळ या फळपिकांसाठी महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरून ही योजना फळपिकासाठी अधिसूचित मंडळामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई मार्फत राबविण्यात येत आहे.. योजनेमध्ये शेतक-यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत डाळींब पिकाकरीता 14  जुलै, 2022 सिताफळ पिकाकरीता 31 जुलै, 2022 आहे.

          तसेच प्रधानमंत्री  पिक विमा योजना सन 22-23 खरीप हंगामाकरिता लागू करण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये जळगाव जिल्ह्यासाठी खरीप हंगामाकरीता  बाजरी, ज्वारी, मका, उडीद, मूग, तुर, तीळ, भुईमूग, सोयाबीन कापूस या पिकासाठी महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरून ही योजना खरीप पिकासाठी अधिसुचित मंडळामध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये शेतक-यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2022 आहे.

          जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मृग बहाराकरिता प्रधानमंत्री पिक विमा योजने मध्ये अधिसुचित महसूल मंडळस्तरावर अधिसुचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे.. तरी जिल्हयातील जास्तीत-जास्त शेतकन्यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे" असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  संभाजी ठाकुर  यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँक, मंडळ कृषि अधिकारी कार्यालय (सर्व), तालुका कृषि अधिकारी कार्यालय     (सर्व तालुके),, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कार्यालय, जळगाव, आकाशवाणी शेजारी, प्रशासकीय इमारत येथे संपर्क साधावा. एग्रीकल्चर इंन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मुंबई  क्षेत्रिाय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वा माळा, दलाल स्ट्रीट फोर्ट, मुंबई -400023, टोल फ्री नंबर-1800 419 5004, -मेल  pilvima@aicofindia.com.  जिल्हा प्रतिनिधी, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मो. क्रं. 9595554473  येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment