जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 2- पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना सन 2021-22 अंबिया बहारा करीता लागु करण्यात आलेली असुन अंमलबजावणी सुरु आहे. वेगाने वाहनारे वारे/ वादळामुळे फळपिक नुकसानग्रस्त विमाधारक शेतक-यांनी नुकसान झालेल्या फळपिकांची माहिती 72 तासात विमा कंपनीला पूर्व सुचने व्दारे ( Intimition) त्वरीत कळविणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात झालेल्या यावल, रावेर व चोपडा तालुक्यात वेगाचे
वाहनारे वारे/ वादळामुळे फळपिकांचे नुकसान झालेले आहे. अशा नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधीत विमा कंपनी,
महसुल विभाग व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तीक पातळीवर फळपिकाचे नुकसानीचे
पंचनामे त्वरीत करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर
यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment