जळगाव (जिमाका वृत्तसेवा) - दि.21- जळगाव जिल्ह्यातील सन 2022-23 च्या खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात होत आहे. माहे जून ,2022 या महिन्यात पाऊसाची सुरुवात झालेली असून जिल्हयात फक्त 34.4 मिमिी तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे. जिल्हयात बागायत कापसाची 20 टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली असून इतर खरीप पिकाची पेरणीची सुरुवात होत आहे. मात्र पऊसाची स्थिती पाहिल्यास अजून पेरणी योग्य पाऊस झालेला नाही.
जिल्हयातील
सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये.
अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास पाऊसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते व दुबार
पेरणीचे संकट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आठवडयातील हवामानाचा अंदाज
पाहुन व जमिनीतील उपलब्ध ओलावा पाहुन पेरणीबाबत निर्णय घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment