जळगाव, दि.30 (जिमाका वृत्तसेवा) : - सदर पत्र लेखाना या विषय - Vision for India 2047 म्हणजेच 2047 मधील भारत असा आहे. सदर स्पर्धेच्या नियम व अटी खालील प्रमाणे आहेत
1)पत्र कोणत्याही भाषेमधून लिहिता येइल, सदर पत्रलेखन स्पर्धेचा कालावधी 01:जुलै, 2022 ते 31.ऑक्टोबर, 2022 असा
आहे, 2) ही पत्र लेखन स्पर्धा वय वर्ष 18
पर्यंत एक गट व वय वर्ष 18 च्या वर दुसरा गट अशा दोन गटात विभागलेली आहे. पत्राच्या
शेवटी स्पर्धकानी "दिनांक 1
जानेवारी, 2022 रोजी माझे वय 18 पेक्षा कमी / जास्त आहे "असा दाखला देणे व
सही करणे गरजेचे आहे. तसेच आपले नाव पत्ता व वयाचा उल्लेख असावा.
3.सदर पत्र आतर्देशिय
पत्र अथवा A 4 साइज पेपर वर लिहिता येऊ शकते पाकिटातून पत्र पाठवण्याची शब्द
मर्यादा 1000 व अंतर्देशीय पत्रासाठी 500 शब्दाची आहे. सदरचे पत्र मुख्य
पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या नावाने लिहून डाकघरा मार्फत लावलेल्या विशेष टपाल
पेटीत टाकावयाचे आहे. पत्र पाठविण्याची शेवटची दिनांक 31.ऑक्टोंबर, 2022 असून त्या
नंतर पाठवलेल्या पत्राचा पत्र लेखन स्पर्धेमध्ये समावेश करण्यात येणार नाही. फक्त
हस्त लिखित पत्रेच स्वीकारली जातील याची नोंद घ्यावी.
4. राज्य
स्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे 25 हजार रुपये, दहा हजार रुपये व पाच
हजार रुपये राज्य स्तरावर निवडलेल्या
प्रत्येक गटातून निवडलेल्या तीन उत्कृष्ट पत्राला राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात
येईल व राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रासाठी अनुक्रमे 50 हजार रुपये, 25
हजार रुपये, दहा हजार रुपये चे पारितोषक देण्यात येईल.
तरी
जास्तीत जास्त संख्येने जनतेने आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन डाक अधिक्षक बी.
व्ही. चव्हाण, जळगाव यानी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. अधिक महिती साठी
0257-2224288 या नंबर वर संपर्क साधावा.
00000
No comments:
Post a Comment