Saturday, 6 July 2019

जिल्ह्यात 20 जुलैपर्यंत 37 (1) (3) कलम जारी


       जळगाव.दि. 6:- जळगाव शहरात मागील आठवड्यात एका शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्याच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी संघटना व पालक तसेच त्यांचे नातेवाईकांकडून विविध स्वरूपाचे आंदोलन, धरणे, मोर्चे, रास्तारोको, इत्यादी स्वरुपाचे आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
        ऑटो रिक्षा चालक-मालक यांच्या कृती समितीने विविध मागण्यांसाठी दि. 9 जुलै रोजी पुकारलेले रिक्षा बंद आंदोलन, जळगाव महानगरपालिकेचे बँक खाते सिल प्रकरण व परिणामी  मनपा कर्मचाऱ्यांच्या वेतन, महापालिकेकडून जनतेला पुरविण्यात येणाऱ्या मुलभूत गरजा व सुविधांवर यांचे विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
         महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेल्या मराठा समाजाचे आरक्षण व त्याअनुषंगाने धनगर समाजाने आरक्षणासाठी सुरू केलेले विविध प्रकारचे आंदोलन. मनपा घोटाळा प्रकरणाचा मा.धुळे न्यायालयात लागणारा निकाल, आषाढी एकादशी निमित्ताने जिल्हयातून गावा-गावांतून संतांच्या पालख्या शेकडोच्या संखेने एकत्रीत येऊन पंढरपुर येथे पायी दिंडीने रवाना होत आहेत.या सर्व घडामोडीत जातीयवादी गुंड, देश विघातक कृत्य करणारे समाजकंटक, याचा फायदा घेवून समाजात तेढ निर्माण करण्याची शक्ता नाकारता येत नाही.
          जिल्ह्यात शांतता, सलोखा तसेच कायदा व  सुवस्था अबाधित राहण्यासाठी  जिल्ह्यात दि. 5 ते 20 जुलै 2019 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम  37 चे पोटकलम (3) जारी करित आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी श्री. वामन कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.  
*****

No comments:

Post a Comment