जळगाव,
दि. ५ - महाराष्ट्र राज्य
माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेमार्फत १७ जुलै ते ३ ऑगस्ट, २०१९ या कालावधीत
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता बारावी) व माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता
दहावी) च्या परिक्षा घेण्यात येणार आहेत.
या कालावधीत परिक्षा केंद्राच्या
ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होवू नये व परिक्षा शांततामय व निर्भय
वातावरणात पार पडण्यासाठी दिनांक १७ जुलै, २०१९ ते ३ ऑगस्ट, २०१९ दरम्यान फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ (१)
(२) जारी करण्यात आले आहे. असे डॉ. अविनाश
ढाकणे, जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment