जळगाव.दि.20:- जिल्ह्यात 23 जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती, 30 जुलै रोजी संत नामदेव महाराज पुण्यतिथी, 31
जुलै रोजी संत सावता माळी पुण्यतिथी आणि 1 ऑगस्ट रोजी शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी इत्यादि जयंती व पुण्यतिथी साजरी होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात, तालुक्यात व गावा-गावांमध्ये मिरवणुका,
रॅली, प्रतिमा पुजन, पुतळा
पुजन अशा विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन
केले जाईल. सदर कार्याक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दी एकवटलेली असते. त्यानंतर आगामी काळात हिन्दु बांधवांचा श्रावण मास सुरू होणार असून विविध स्वरुपांचे सण उत्सव त्या दरम्यान साजरे होणार आहेत.
तरी
या सर्व जयंती, पुण्यतिथी
तसेच सण आणि उत्सवात काही समाजकंटक, जातीय गुंड, समाजात तेढ निर्माण होईल, अशांतता निर्माण होईल अश्या प्रकारचे कृत्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही ही बाब लक्षात घेता कोणताही अनुचीत प्रकार घडू नये व कायदा व सुवस्था अबाधित राहण्यासाठी संपूर्ण
जिल्हा हद्दीत दिनांक 21 जुलै ते 4 ऑगस्ट 2019 दरम्यान मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) कलम जारी करण्यात आले आहे.
तरी
जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्ह्यात शांतता अबाधित राहण्यासाठी प्रशासनास
सहकार्य करावे असे आवाहन अपर जिल्हा दंडाधिकारी
वामन कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment