चाळीसगाव, दि.६ :- राज्य शासनाच्या लोकोपयोगी सर्व योजना
शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून जनताभीमुख कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना
खासदार उन्मेश पाटील यांनी चाळीसगाव तहसिल कार्यालयात आयोजित प्रशासकीय कामांच्या
आढावा बैठकीत उपस्थित सर्व विभाग
प्रमुखांना दिल्यात.
याप्रसंगी
प्रांताधिकारी शरद पवार , तहसिलदार अमोल मोरे
यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार उन्मेश पाटील पुढे म्हणाले की,
राज्य शासनाच्या भरपुर लोकोपयोगी योजना आहेत शिवाय या सर्व योजना पूर्णत्वास नेण्यास
शासन कटीबद्ध आहे. लोकाभिमुख कामे पूर्ण करताना प्रशासनाकडून कुठलीही
कमतरता राहता कामा नये यासाठी शासन-प्रशासनात
समन्वय असणे आवश्यक असल्याचे खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
आषाढी एकदशी निमित्ताने १५ जुलै
रोजी जत्रा योजना अभियानाचे आयोजन
करून या महोत्सवात कृषि महोत्सव, सांस्कृतिक महोत्सव, मातृयोजना,
सांस्कृतिक महोत्सव पंतप्रधान घरकुल
योजना, विहिरी पुर्नभरण, सांस्कृतिक महोत्सव
पंतप्रधान घरकुल योजना, विहिरी पुर्नभरण योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी २० रुपयात स्मार्टकार्ड आदि योजनेचा प्रचार व
प्रसार होवून प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही करता येईल असेही
खा.पाटील यांनी यावेळी सांगितले.
०००००
No comments:
Post a Comment