अमळनेरला महिला सक्षमीकरण
अंतर्गत बचत गटांना तालुकास्तरावर प्रशिक्षण कार्यशाळा
जळगाव,
दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य महिला आयोग संकटग्रस्त महिलांसाठी
हक्काचे माहेर आहे, असे प्रतिपादन आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज केले.
अमळनेर
येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात महिला सक्षमीकरण अंतर्गत बचत गटांना
तालुकास्तरावर प्रशिक्षण कार्यशाळा पंचायत समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात
आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार स्मिताताई वाघ, नगराध्यक्षा
पुष्पलता पाटील, पंचायत समिती सभापती वजाबाई भिल, प्रांताधिकारी सीमा अहिरे,
तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी अजय नष्टे, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप
वायाळ, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे,
बालविकास प्रकल्प अधिकारी बी. बी. वारुळकर, निवृत्त पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील,
शुभदा करमरकर, उद्योजिका अर्चना वाणी, आदी उपस्थित होते.
श्रीमती
रहाटकर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य महिला
आयोग संकटात सापडलेल्या महिलांना मदत करुन पीडित महिलांना संरक्षण देण्याचे काम
करते. महिलांनी समस्या, अडचणी, तक्रारी असतील, तर थेट महिला आयोगाकडे दाद मागावी.
महिला आयोगाचे काम गावागावात पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
महिला
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. त्यांचा लाभ बचत
गटांनी घ्यावा. गावागावात शौचालये, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमुळे परिवर्तन
घडून आले आहे. प्रधान मंत्री मातृसन्मान योजनेंतर्गत सहा हजार रुपयांचा निधी
देण्यात येतो. मोठ्या आजारांवरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी योजनेतून मदत
केली जाते. सुमतीताई सुकळीकर उद्योग योजना, दशसूत्री बचत गट योजनेतून 15 हजार
रुपयांपर्यंत, नवतेजस्विनी योजना,नारी तू नारायणी योजनांची माहिती देत जनधन योजने
अंतर्गत 5 हजार रुपये ओव्हर ड्रॉप घेता येतो, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी
आमदार श्रीमती वाघ, श्री. पाटील, उद्योजिका श्रीमती वाणी यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी प्रज्वला योजनेअंतर्गत बचत गट महिला सदस्यांचे प्रशिक्षणात महाराष्ट्र
राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानच्या तालुका अभियान व्यवस्थापक सीमा रगडे, तालुका
व्यवस्थापक, ज्योती भावसार, तालुका व्यवस्थापक योगिता इंगळे यांनी माहिती दिली.
000
No comments:
Post a Comment