जळगाव, दि.20 - लोकसभा सार्वत्रिक
निवडणूक 2019 च्या अनुषंगाने राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असून जळगाव जिल्ह्यात
23 एप्रिल, 2019 रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी
व सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी
प्रतिबंधात्मक आदेश लागू होणे जरुरीचे असल्याचे पोलीस अधिक्षक, जळगाव यांनी कळविले
आहे.
त्यानुसार जिल्हादंडाधिकारी, जळगाव
यांनी प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन व मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37
चे पोटकलम (1) व (3) मधील अधिकाराचा वापर करुन पोलीस अधिक्षक, जळगाव यांचे पुर्व
परवानगी शिवाय सभा घेण्यांस किंवा
मिरवणुका काढण्यास या आदेशान्वये बंदी घालीत आहे. हा आदेश 20 एप्रिल, 2019 रोजी
सकाळी 6.00 वाजेपासून ते दिनांक 4 मे, 2019 पर्यंत रात्री 24.00 वाजेपावेतो लागू
राहील. असे अपर जिल्हादंडाधिकारी वामन कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले
आहे.
०००
No comments:
Post a Comment