जळगाव, दि.15- शासकीय बहुउद्देशीय अपंग संमिश्र केंद्र, मेहरुण रोड, जळगाव या संस्थेत सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षाकरीता 6 ते 15 वर्षे वयोगटातील अंध, मुकबधीर, अस्थिव्यंग मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे.
प्रवेशासाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज 1 जून, 2019 पर्यंत संमिश्र केंद्राच्या कार्यालयात मिळतील. बिनचुक भरलेले अर्ज 15 जूनपर्यंत संस्था कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज प्राप्त उमेदवारांना जुन महिन्यात वैद्यकीय तपासणी व पालकांशी चर्चा करण्यासाठी बोलविण्यात येणार असून दुसऱ्या दिवशी अंतीम यादी घोषीत करण्यात येणार असल्याचे समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय बहुउद्देशीय अपंग संमिश्र केंद्रामार्फत मोफत भोजन, निवास, गणवेश, अंथरूण-पांघरून, क्रमीक पुस्तके, शालेय साहित्य, औषधोपचार, शालेय व कला शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. उमेदवार हा अंध, कर्णबधीर किंवा अस्थिव्यंग यापैकी एकाच प्रकारचे अपंगत्व असणारा असावा. एकापेक्षा अधिक प्रकारचे अपंगत्व असणाऱ्या उमेदवारास अर्ज करता येणार नाही. उमेदवारास कोणताही संसर्गजन्य आजार नसावा. उमेदवारांनी अर्ज पाठवितांना अर्जासोबत प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती पाठवाव्यात. प्रवेश घेतेवेळी मुळ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रणापत्र (ऑनलाईन). जन्म दाखला, उत्पन्नाचा दाखला, मुलाचे अपंगत्व दिसेल असे 4 छायाचित्र, आधारकार्ड , रेशनकार्ड आदि कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
तीनही अपंगत्वाचे प्रवर्गानुसार त्या-त्या विभागातील तज्ञांचा वैद्यकीय दाखला व मुकबधीरांसाठी श्रवणालेख आवश्यक आहे. अस्थिव्यंग मुलांना शारिरीक पुनर्वसन हा मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी प्रवेश दिला जाईल व या कालावधीत त्यांना शालेय शिक्षणही दिले जाईल. शारिरीक पुनर्वसन झाल्यानंतर त्यांचे पुढील वर्षी संस्थेतून नाव कमी करण्यात येईल.
संस्थेत प्रवेश दिल्यानंतर संस्थेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पूर्ण व बिनचुक भरलेले अर्ज अधिक्षक, शासकीय बहुउद्देशीय अपंग संमिश्र केंद्राकडे मुदतीत सादर करावेत. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी कळविले आहे.
000
प्रवेशासाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज 1 जून, 2019 पर्यंत संमिश्र केंद्राच्या कार्यालयात मिळतील. बिनचुक भरलेले अर्ज 15 जूनपर्यंत संस्था कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज प्राप्त उमेदवारांना जुन महिन्यात वैद्यकीय तपासणी व पालकांशी चर्चा करण्यासाठी बोलविण्यात येणार असून दुसऱ्या दिवशी अंतीम यादी घोषीत करण्यात येणार असल्याचे समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय बहुउद्देशीय अपंग संमिश्र केंद्रामार्फत मोफत भोजन, निवास, गणवेश, अंथरूण-पांघरून, क्रमीक पुस्तके, शालेय साहित्य, औषधोपचार, शालेय व कला शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. उमेदवार हा अंध, कर्णबधीर किंवा अस्थिव्यंग यापैकी एकाच प्रकारचे अपंगत्व असणारा असावा. एकापेक्षा अधिक प्रकारचे अपंगत्व असणाऱ्या उमेदवारास अर्ज करता येणार नाही. उमेदवारास कोणताही संसर्गजन्य आजार नसावा. उमेदवारांनी अर्ज पाठवितांना अर्जासोबत प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती पाठवाव्यात. प्रवेश घेतेवेळी मुळ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रणापत्र (ऑनलाईन). जन्म दाखला, उत्पन्नाचा दाखला, मुलाचे अपंगत्व दिसेल असे 4 छायाचित्र, आधारकार्ड , रेशनकार्ड आदि कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
तीनही अपंगत्वाचे प्रवर्गानुसार त्या-त्या विभागातील तज्ञांचा वैद्यकीय दाखला व मुकबधीरांसाठी श्रवणालेख आवश्यक आहे. अस्थिव्यंग मुलांना शारिरीक पुनर्वसन हा मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी प्रवेश दिला जाईल व या कालावधीत त्यांना शालेय शिक्षणही दिले जाईल. शारिरीक पुनर्वसन झाल्यानंतर त्यांचे पुढील वर्षी संस्थेतून नाव कमी करण्यात येईल.
संस्थेत प्रवेश दिल्यानंतर संस्थेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पूर्ण व बिनचुक भरलेले अर्ज अधिक्षक, शासकीय बहुउद्देशीय अपंग संमिश्र केंद्राकडे मुदतीत सादर करावेत. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment