जळगाव
दि. 8 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी
उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेने पालन करावे, आदर्श आचारसंहितेचे पालन न
करण्याऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येतील. असे प्रतिप्रादन जिल्हाधिकारी
तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज केले.
जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व केंद्रीय निवडणूक
निरीक्षक सर्वश्री. डॉ.अजयकुमार, श्री.छोटे लाल पासी, श्री.असिम विक्रांत मिंज यांच्या
उपस्थितीत उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक विषयक विविध
मुद्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत
होते.
जिल्हा निवडणूक निर्णय
अधिकारी डॉ. ढाकणे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, उमेदवारांनी
खर्चाचा अहवाल दररोज सादर करणे गरजेचे आहे, उमेदवाऱ्यांना 10 हजार रुपऱ्यांपर्यंतचा
व्यवहार रोखीने करता येईल. त्यापुढील व्यवहार धनादेशाद्वारे करावा लागेल. उमेदवारांना
त्यांचे प्रचारासाहित्य हे माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीमार्फत (MCMC)
तपासून घेणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांचे उमेदवारांनी पालन
करावे, असे सांगुन डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, निवडणूक लढवणाऱ्या ज्या उमेदवारांवर
गुन्हे दाखल असतील अशा उमेदवारांनी स्थानिक केबल वाहिण्यावर तसेच सर्वात जास्त
खपाच्या दैनिकांत 21 एप्रिल पूर्वी किमान तीन वेळा तसे प्रसारीत करणे आवश्यक
आहे.
प्रत्येक
उमेदवाराला एक उमेदवार प्रतिनिधी व निवडणूक खर्च प्रतिनिधी नेमता येईल. उमेदवारांनी
त्यांचे खर्चाचे रजिस्टर दर तीन दिवसांनी निवडणूक शाखेकडून तपासून घेणे आवश्यक
आहे. तसेच मतदान केंद्रावर उमेदवाऱ्यांचे
प्रतिनिधी नेमण्याचे फार्मही त्वरीत भरुन द्यावे. उमेदवारांची निवडणूकी संदर्भात
कोणतीही तक्रार असल्यास 1950 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ. ढाकणे
यांनी उपस्थितांना केले.
या
निवडणूकीसाठी वापरण्यात येणारे ईव्हिएम मशिन व बॅलेट युनिटचे सेंटीग व सिलींग 15
एप्रिल 2019 पासून भुसावळ येथील गोदामात होणार आहे. या ठिकाणी उमेदवार व त्यांचे
प्रतिनिधी यांना उपस्थितीत राहता येईल. या मशिन वाहतुक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस
यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. तसेच मतदारांना मतदानाच्या चिठ्ठ्या द्याव्याच्या
असल्यास त्यावर उमेदवाराचा फोटो व निशाणी नको असे सांगून उमेदवारांना सकाळी 6 ते
रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येईल. उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक त्या
परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात आली असून या योजनेच्या
माध्यमातून 24 तासाच्या आता परनवानगी देण्यात येईल. अतिदुर्गम भागातील मतदान
केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त पुरविण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा पोलीस
अधिकारी डॉ. पंजाबराव उगले म्हणाले की, निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा
प्रश्न निर्माण होवू नये यासाठी उमेदवारांनी जिल्हा प्रशासनास मदत करावी,
उमेदवारांच्या प्रचाराच्या वेळी वेगवेगळे मान्यवर प्रचारासाठी येतात. अशा वेळी
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी उमेदवारांनी याबाबतची माहिती पोलीस
विभागाकडे अगोदर द्यावी.
यावेळी
केंद्रीय पोलीस निरीक्षक असिम विक्रांत मिंज यावेळी उमेदवारांना मार्गदर्शन
करतांना म्हणाले की, उमेदवारांनी निवडणूक कालावधीत यंत्रणेला सहकार्य करावे व
आपल्या काही तक्रारी असतील त्यांची जिल्हा प्रशासनास द्यावी. तेथे उमेदवारांच्या
तक्रारीचे निराकरण न झाल्यास निरीक्षकास संपर्क साधानाचे अहवानही त्यांनी केले.
यावेळी
केंद्रीय निवडणूक निरीक्षक डॉ. अजयकुमार म्हणाले की, निवडणूकीच्या दिवशी प्रत्येक
मतदान केंद्रावर सकाळी 6 वाजता मॉपपोल होणार असून उमेदवारांनी आपले प्रतिनिधी त्याठिकाणी
वेळेवर उपस्थितीत राहतील यांची खबरदारी घेण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. या
बैठकीस रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, निवासी
उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हा निवडणुक अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह नोडल
अधिकारी उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment