जळगाव, दि. 30 - जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध असणे
आवश्यक आहे. भविष्यात उत्पन्न होणाऱ्या चारा टंचाईची परिस्थिती लक्षात घेता या परिस्थितीवर मात करण्यासाठी
जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, यांनी
जळगाव जिल्ह्यातील चारा लगतच्या जिल्ह्यात किंवा लगतच्या राज्यात वाहतुक करण्यास
निर्बंध घातले आहेत. हे आदेश पुढील 60 दिवसाच्या कालावधीसाठी लागू राहतील.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या
व्यक्तीविरुध्द, संस्थेविरुध्द फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील तरतुदीनुसार
कारवाई करण्यात येईल. असेही डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment