Monday, 5 August 2019

खरीप हंगामातील सिंचनासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत - कार्यकारी अभियंता बेहेरे

       जळगाव, (जिमाका) दि. 5 :- गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव विभागाच्या अधिपत्याखालील गिरणा प्रकल्पावरील जामदा डावा कालवा, उजवा कालवा, पांझण डावा कालवा व निम्न गिरणा कालव्यावरून व मन्याड, बोरी, भोकरबारी, अंजनी या मध्यम प्रकल्पावर तसेच बोळे, सावरखेडा, शिरसमणी पिंपळकोठा भेालाणे, म्हसवा, कंकराज ता. पारोळा निसर्डी, आर्डी तालुका अमळनेर मन्यारखेडा, विटनेर ता.जळगाव पद्मालय खडकेसिम ता.एरंडोल हातगाव-1 खडकीसीम, पिंप्री-उबरखेड, वलठाण, ता.चाळीसगाव, पथराड ता.भडगाव या लघु प्रकल्पावरून कालवाप्रवाही, कालवा उपसा जलाशयउपसा, लाभक्षेत्रातील, अधिसुचित नदी, नाले, ओढे यावरून उपसा सिंचनाने पाण्याचा लाभ घेण्यासाठी सर्व संबंधित लाभधारकांनी खरीप हंगाम 2019-2020 मध्ये धरणात सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध होईल. असे गृहीत धरून दिनांक 1 जुलै ते 14 ऑक्टोंबर 2019 या मुदतीतील साळ, ज्वारी व इतर अन्नधान्य भुसार पिकांकरीता कपाशी, भुईमुग, भाजीपाला, चारा इत्यादि हंगामी पिकांसाठी पाणीसाठ्याच्या उपलब्धतेनुसार हंगामी पिकांना सिंचनासाठी हंगामी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.
        तरी वरील दर्शविलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज दिनांक 31 ऑगस्ट, 2019  पर्यंत सादर करावेत. असे ध. ब. बेहेरे, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग,जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        **

No comments:

Post a Comment