जळगाव,
दि. 13 - महाराष्ट्र राज्यातील युवांच्या सर्वांगीण विकासाकरीता राज्यात युवा संसद
हा कार्यक्रम शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या
कार्यक्रमांची टॅगलाईन युवा जागर- महाराष्ट्रावर बोलू काही अशी आहे. राष्ट्रीय व
राज्य निर्माणामध्ये युवांचा सहभाग वाढविणे, युवांमध्ये नेतृत्व गुणाचा विकास
करणे, युवांच्या सुप्त गुणाना वाव देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
जिल्हास्तर युवा संसद 22 ऑगस्ट रोजी
सकाळी 9.00 वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, स्टेट बँक ऑफ
इंडिया समोर, जळगाव, कनिष्ठ स्तरावर व तालुकास्तरावर 15 विषयावर वक्तृत्व स्पर्धा
घेण्यात येणार आहेत, युवक/युवती कडून मांडण्यात आलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने
विषयाचे सखोल ज्ञान, मुद्दे मांउणी, वक्तृत्व कला, सादरीकरण व प्रभाव अशा एकूण पाच
बाबींसाठी प्रत्येकी 20 गुणाप्रमाणे एकूण 100 गुणाचे मुल्यांकन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात युवा संसद हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालय,
तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळा/माध्यमिक शाळा ज्यांना 11 वी/12 वीचे वर्ग संलग्न
आहेत. समाजकल्याण अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक शासकीय व अनुदानित आश्रमशाळा
/माध्यमिक शाळा ज्यांना 11 वी 12 वीचे वर्ग संलग्न आहेत. त्यांचे 11 वी 12 वीचे
युवक/युवती यांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव व
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी संयुक्तरित्या केले आहे.
या उपक्रमात 15 ते 19 या वयोगटातील
सर्व कनिष्ठ महाविद्यालय तसेच शासकीय अनुदानित आश्रमशाळा/माध्यमिक विद्यालय
ज्यांना 11 वी 12 वीचे वर्ग संलग्न आहेत. या कार्यक्रमासाठी
मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या सभेचे आयोजन शिक्षणाधिकारी माध्यमिक, जळगाव व
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जळगाव यांचेमार्फत जिल्हा क्रीडा संकूल येथे
आयोजित करण्यात आले होते.
वक्तृत्व स्पर्धा व युवा संसद
कार्यक्रमाचे मुख्यत्वे तीनस्तर असून यात प्रथम स्तर (कनिष्ठ स्तर) 15 ते 19 वयोगटातील 11 वी 12 वीचे वर्ग संलग्न
आहेत. द्वितीयस्तर (तालुका स्तर/गटस्तर)
यामध्ये 20 किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमी कनिष्ठ महाविद्यालयाचा एक गट
याप्रमाणे 14 गट करण्यात आलेले आहेत. तृतीय स्तर (जिल्हास्तर युवा संसद कार्यक्रम
:- जिल्हास्तरावर तालुका/गट स्तरावरील प्रथम तीन क्रमांक प्राप्त झालेल्या युवांचा
सहभाग.
जिल्हास्तरावर
सर्वोत्कृष्ठ तीन युवांना प्रथम रूपये 10 हजार, द्वितीय रूपये 7 हजार व तृतीय
रुपये 5 हजार याप्रमाणे शासकडून निधी प्राप्त झाल्यावर देण्यात येणाऱ्या
जिल्हास्तर युवा संसद कार्यक्रम, कनिष्ठ स्तरावर व तालुकास्तरावर, युवक/युवती कडून
मांडण्यात आलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने स्पर्धा व गुणांकन असे आहेत.
000
No comments:
Post a Comment