जळगाव. दि. 11 - संपुर्ण राज्यात
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण
कार्यक्रम सन 2017-18 पासून सुरु आहेत. हे दोन्ही कार्यक्रम जीवनशैलीशी निगडीत
आहेत. जिल्ह्यात तंबाखू सेवनाने होणारे असंसर्गजन्य रोगांना आळा घालणेकरिता व
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी जनजागृतीमार्फत
जीवनशैलीत बदल घडवून आणणे गरजेचे आहे.
ग्लोबल
अडल्ट टोबॅको सर्वे (२GAT) 2017-18 च्या सर्वेक्षणानुसार धुम्रपान करण्या-यांचे
प्रमाण हे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे कमी असेल तरी धुरविरहीत तंबाखू
सेवनाचे प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे कमी वयात तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनांची
सवय लागण्याचे प्रमाण वाढल्याची गंभीर बाबही दिसुन आली आहे. यावर प्रतीबंधात्मक
उपाय व जनजागृतीचा भाग म्हणून 15 ऑगस्ट, 2019 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व
शासकीय, निमशासकीय कार्यालये/आस्थापनांमधून तंबाखू मुक्तीची शपथ घ्याव. तसेच
तंबाखुच्या परिणामांबाबत माहिती विषयक व्याख्याने, प्रभातफेरी, पथनाट्य, शिबिरे
आयोजित करावी. प्रत्येक संस्था तंबाखू मुक्त होण्यासाठी संस्था स्तरावर तंबाखू
नियंत्रण समिती स्थापन करावी, तंबाखू नियंत्रण कायदा कोटपा 2003 (कोट़पा) च्या कलम 4 नुसार सुचना फलक लावावे.
तंबाखू नियंत्रणासाठी एक अधिकारी नेमावा व संस्था तंबाखू मुक्त घोषित करावी. असे
आवाहन डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा तंबाखू नियंत्रण समिती,
जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
याविषयाच्या कार्यक्रमांचा अहवाल
जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय, जळगाव यांचेकडे ntcpjalgaon@gmail.com या ईमेल वर 18 ऑगस्ट,
2019 च्या आधी पाठवावा. याबाबत अधिक माहिती साठी त्यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन
डॉ. ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा तंबाखू नियंत्रण समिती, जळगाव यांनी
केले आहे.
०००
No comments:
Post a Comment