जळगाव, दि.7 - राज्यातील बिगर गॅस जोडणीधारकांना 31 मार्च, 2020 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना गॅस जोडणी देवून चूलमुक्त महाराष्ट्र, धूरमुक्त महाराष्ट्र करण्याचा पुरवठा विभागाचा मानस आहे. त्यानुसार जी शिधापत्रिकाधारक कुटुंबे प्रधानमंत्री उज्वला योजना व विस्तारीत प्रधानमंत्री उज्वला योजना-2 यांच्या निकषांमध्ये पात्र ठरणार नाहीत अशा कुटुंबांसाठी ही योजना लागू आहे. या योजनेत सहभाग नोंदवितांना सदर कुटुंब हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे. सदरची गॅस जोडणी ही कुटुंबातील प्रौढ स्त्रीच्या नावाने मंजूर करण्यात येईल, एक शिधापत्रिकाधारक कुटूंब एकच गॅस जोडणी मिळण्यास पात्र राहील.
बिगर गॅस जोडणीधारकांना शासनामार्फत गॅस जोडणी वितरीत करण्याबाबतची योजना असून त्यासाठी जी कुटुंबे प्रधानमंत्री उज्वला योजना व विस्तारीत प्रधानमंत्री उज्वला योजना-2 अंतर्गत गॅस मिळण्यास पात्र ठरणार नाही किंवा त्यांना वरील योजनेत गॅस जोडणीचा लाभ मिळणार नाही. अशा सर्व संबंधित पात्र शिधापत्रिकाधारक/लाभार्थी यांनी त्यांच्या अर्जासोबत शिधापत्रिका, कुटुंबप्रमुख स्त्री व कुटूंबातील इतर व्यक्तींचे आधारकार्ड व लाभार्थ्यांचा (कुटुंबप्रमुख स्त्री) बँकेचा तपशील इत्यादि कागदपत्रांच्या छायांकित प्रती संबंधित शिधावाटप दुकानदारांकडे जमा करावयाची आहे. शिधावाटप दुकानदारांमार्फत असे प्राप्त झालेले अर्ज व आवश्यक कागदपत्रे संबंधित गॅस एजन्सीला दिली जातील व गॅस एजन्सी ज्यांची कागदपत्रे परिपुर्ण असतील अशा शिधापत्रिकाधारक कुटुंबांना तात्काळ गॅस जोडणी मंजूर करण्यात येईल.
अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी असलेल्या ज्या कुटुंबाकडे अद्याप गॅस जोडणी नाही तसेच ज्यांनी अद्याप उज्वला योजनेतून गॅस जोडणीचा लाभ घेतलेला नाही अशा कुटूंबांनी त्वरीत जवळच्या स्वस्त धान्य दुकानदार अथवा तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेकडे संपर्क करून अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000
बिगर गॅस जोडणीधारकांना शासनामार्फत गॅस जोडणी वितरीत करण्याबाबतची योजना असून त्यासाठी जी कुटुंबे प्रधानमंत्री उज्वला योजना व विस्तारीत प्रधानमंत्री उज्वला योजना-2 अंतर्गत गॅस मिळण्यास पात्र ठरणार नाही किंवा त्यांना वरील योजनेत गॅस जोडणीचा लाभ मिळणार नाही. अशा सर्व संबंधित पात्र शिधापत्रिकाधारक/लाभार्थी यांनी त्यांच्या अर्जासोबत शिधापत्रिका, कुटुंबप्रमुख स्त्री व कुटूंबातील इतर व्यक्तींचे आधारकार्ड व लाभार्थ्यांचा (कुटुंबप्रमुख स्त्री) बँकेचा तपशील इत्यादि कागदपत्रांच्या छायांकित प्रती संबंधित शिधावाटप दुकानदारांकडे जमा करावयाची आहे. शिधावाटप दुकानदारांमार्फत असे प्राप्त झालेले अर्ज व आवश्यक कागदपत्रे संबंधित गॅस एजन्सीला दिली जातील व गॅस एजन्सी ज्यांची कागदपत्रे परिपुर्ण असतील अशा शिधापत्रिकाधारक कुटुंबांना तात्काळ गॅस जोडणी मंजूर करण्यात येईल.
अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी असलेल्या ज्या कुटुंबाकडे अद्याप गॅस जोडणी नाही तसेच ज्यांनी अद्याप उज्वला योजनेतून गॅस जोडणीचा लाभ घेतलेला नाही अशा कुटूंबांनी त्वरीत जवळच्या स्वस्त धान्य दुकानदार अथवा तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेकडे संपर्क करून अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000
No comments:
Post a Comment