जळगाव, दिनांक 14 - जिल्हा जाती
प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्राप्त शैक्षणिक, सेवा व निवडणुक प्रकरणी ज्या
अर्जदारांच्या प्रस्तावात त्रुटी आहेत/अपुरे आहेत, तसेच अभिलेख तपासणी आवश्यक आहे.
अशा अर्जदारांना लेखी पत्राव्दारे व दुरध्वनीव्दारे अवगत करण्यात आले आहे. ज्या
अर्जदारांनी व ग्रामपंचायत निवडणुक पुर्तता केली नाही किंवा त्रुटीचे पत्र पोहोच
झाले नाहीत अशा सर्व अर्जदारांनी व ग्रामपंचायत निवडणुक 2018-2019 मध्ये आरक्षित
जागेवर निवडुन आलेले आहेत मात्र या कार्यालयाकडे निवडून आल्याचे जाहिरनामे सादर
केलेले नाहीत. अशा उमेदवारांनी निवडुन आल्याबाबतचा जाहिरनामासह दिनांक 19 व 20
ऑगस्ट, 2019 रोजी समिती कार्यालयात उपस्थित राहून त्रुटीची पुर्तता करावी.
ज्या
अर्जदारांची प्रकरणे त्रुटी पुर्तता न केल्यामुळे/पुरावे सादर न केल्यामुळे
प्रलंबित राहतील, अशी प्रकरणे जाती प्रमाण्पत्र पडताळणी नियमावलीमधील कलम 17 (2)
अन्वये निकाली काढण्यात येतील याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन उपायुक्त,
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
000
No comments:
Post a Comment