जळगाव.दि.08
:- ग्रामविकास विभागाच्या 9 फेबुवारी 2018 अध्यादेशानुसार आरक्षित पदांवर निवडणूक
लढविणाऱ्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्राऐवजी वैधतेसाठी सादर केलेल्या अर्जाची
पोहचपावती किंवा इतर पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र घेण्यासंदर्भात 30 जून
2019 पर्यंत मुदतवाढ दिलेली होती. सदर मुदत संपुस्टात आली असून गामविकास विभागाने
हमीपत्र घेण्यासंदर्भात अद्याप मुदतवाढ दिलेली नाही.
तरी सद्यस्थितीत महाराष्ट्र
ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 10-1 अ मधील तरतुदीनुसार राखीव असलेल्या जागेसाठी
निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने नामनिर्देशनपत्रासोबत सक्षम
प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता
प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे नोडल
अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी महसूल प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment