Monday, 19 August 2019

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत


            जळगाव, दि. 19 - केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत अर्ज मागविण्यात आल्याची माहिती आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
             बाल शक्ती  पुरस्कारासाठी ज्या मुलांनी ( 5 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्ष वयोगटा पर्यंत) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य,  खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, अश्यांना हा पुरस्कार दिला जातो.
        बालकल्याण पुरस्कारांतर्गत वैयक्तीक पुरस्कार हा मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. तर संस्था स्तरावर बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पुर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.
           बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार करीता अर्ज www.nca-wed.nic.in  या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने 31 ऑगस्ट,  2019 पर्यंत स्वीकारले जातील. असे विजयसिंह परदेशी, जिल्हा महिला व बाल कल्याण विकास अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000

No comments:

Post a Comment