जळगाव, (जिमाका) दि. 4 - जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण 134 तक्रार अर्ज दाखल झाले. यामध्ये प्रामुख्याने सहकार, जिल्हा परिषद, महानगर पालिका, महसुल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस व महिला व बालकल्याण विभाग यासह इतर विभागांच्या तक्रारींचा समावेश आहे.
या जिल्हास्तरीय लोकशाही दिनास जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वन विभागाचे उप वनसंरक्षक पी.पी.मोराणकर, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखा अधिकारी विनोद गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) बी. ए. बोटे, सहायक आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी गेल्या दहा महिन्यातील लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या 422 प्रलंबित तक्रारींचा आढावा घेतला. तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्या सर्व तक्रार अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिलेत. तक्रारदारांना पुन्हा लोकशाही दिनात तक्रार घेऊन येण्याची आवश्यकता भासू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.
त्याचप्रमाणे नागरीकांनी लोकशाही दिनाशी संबंधितच तक्रारी मांडाव्यात. न्यायप्रविष्ठ असलेल्या विषयांच्या व इतर तक्रारी लोकशाही दिनात आणू नयेत, लोकशाही दिनास बाहेरुन गावाहून नागरीक येत असतात. त्यामुळे त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण होण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी उपस्थित राहवे. जे विभागप्रमुख विनापरवानगी गैरहजर राहतील. त्यांचे कार्यवाही करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आजच्या बैठकीत दिला.
000
या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण 134 तक्रार अर्ज दाखल झाले. यामध्ये प्रामुख्याने सहकार, जिल्हा परिषद, महानगर पालिका, महसुल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस व महिला व बालकल्याण विभाग यासह इतर विभागांच्या तक्रारींचा समावेश आहे.
या जिल्हास्तरीय लोकशाही दिनास जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वन विभागाचे उप वनसंरक्षक पी.पी.मोराणकर, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखा अधिकारी विनोद गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) बी. ए. बोटे, सहायक आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी गेल्या दहा महिन्यातील लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या 422 प्रलंबित तक्रारींचा आढावा घेतला. तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्या सर्व तक्रार अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिलेत. तक्रारदारांना पुन्हा लोकशाही दिनात तक्रार घेऊन येण्याची आवश्यकता भासू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.
त्याचप्रमाणे नागरीकांनी लोकशाही दिनाशी संबंधितच तक्रारी मांडाव्यात. न्यायप्रविष्ठ असलेल्या विषयांच्या व इतर तक्रारी लोकशाही दिनात आणू नयेत, लोकशाही दिनास बाहेरुन गावाहून नागरीक येत असतात. त्यामुळे त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण होण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी उपस्थित राहवे. जे विभागप्रमुख विनापरवानगी गैरहजर राहतील. त्यांचे कार्यवाही करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आजच्या बैठकीत दिला.
000
No comments:
Post a Comment