जळगाव,
दि. 1 - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत काढणी पश्चात व्यवस्थापन व
हवामान अनुकुल मुल्यसाखळी प्रोत्साहन तसेच शेतमाल वृध्दीसाठी हवामान अनुकुल उद्योनमुख
साखळीचे बळकटीकरण करणे या घटकांतर्गत कृषी व्यवसाय स्थापन करण्यासाठी पत संलग्नता
(CREDIT LINKED) असणे बंधनकारक करण्यात आले होते.
तथापि,
प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प, मुंबई यांचे 24 ऑक्टोबर,
2019 च्या पत्रानुसार शेतकरी उत्पादक कंपनी/संघ/गट यांनी कृषी व्यवसाय संबंधी
प्रस्ताव सादर करण्यासाठी 20 लाखापर्यंतच्या प्रस्तावास बँकेत किंवा वित्तीय
संस्थेत पत संलग्नता (Credit Linked) ची अट शिथील करण्यात आली आहे.
तरी जिल्ह्यातील शेतकरी
उत्पादक कंपनी/संघ/गट हे स्वनिधीतून प्रकल्प उभारणी करू शकतात. अधिक माहितीसाठी
संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन प्रकल्प
संचालक, आत्मा, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकानवये केले आहे.
000
No comments:
Post a Comment