जळगाव, दि. 30 - वाघुर धरण विभाग, जळगावच्या
कार्यक्षेत्रातील वाघुर डावा कालवा व उजवा कालवा तसेच कालवा उपसा व जलाशय उपसा यावरील
प्रकल्पावर जेथे शक्य असेल तेथे कालव्याद्वारे (प्रवाह) तसेच अधिसुचित/अनाधिसुचित
लाभ क्षेत्रातील नदी, नाला व इतर जलाशयातून उपसा सिंचनाने पाण्याचा उपयोग घेणाऱ्या
सर्व बागायदारांना सूचित करण्यात येते की, चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध झालेल्या
पाणी साठ्यानुसार 15 ऑक्टोबर, 2019 ते 28 फेब्रुवारी, 2020 दरम्यानच्या रब्बी
हंगामासाठी कपाशी, ज्वारी, गहु, हरभरा, बारमाही भाजीपाला इतर तेलबिया कडधान्य व
भुसार पिके इत्यादि पिकांसाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षणा व्यतिरिक्त उपलब्ध
साठ्यातून अटी व शर्तींच्या अधिन राहून पाणी पुरवठा करण्याचे नियोजित केले आहे.
सिंचनाच्या पाणीपुरवठ्यासाठी अटी व शर्ती अशा
आहेत.
लाभधारक शेतकरी यांनी 2018-2019 पर्यंतची संपूर्ण पाणीपट्टी थकबाकीसह भरणा
केलेली असावी. पाटमोट संबंध नसावा, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजूरी दिली
जाईल. शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी तसेच प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय
मंजूरी मिळाल्याचे गृहित धरू नये. पाणी अर्जाचा निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत/गामपंचायत
कार्यालयात नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल. 20 डिसेंबर, 2019 नंतर आलेले पाणी
अर्जांवर नियमानुसार जादा पाणीपट्टी आकारणी केली जाईल. मंजूर क्षेत्रासच व मंजुर
पिकांनाच पाणी घ्यावे लागेल. पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा किंवा खाते पुस्तीका
संबंधित उपविभागास दाखवावी लागेल. मंजुरी पाटबंधारे अधिनियम (महाराष्ट्र राज्य)
1976 प्रचलीत शासनाने वेळोवेळी काढलेले आदेश तसेच प्रचलीत नियमानुसार अनुसरून
राहील.
तरी लाभार्थी शेतकऱ्यांना
असेही सूचित करण्यात येते की, उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करून
अन्नधान्याचे अधिक उत्पादन वाढवावे तसेच महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे
विभागाकडील 13 सप्टेंबर, 2019 च्या सुधारित दराप्रमाणे केलेली आकारणी भरणे
लाभार्थी शेतकऱ्यांना भरणे बंधनकारक राहील. याची नोंद घेवून संबंधित लाभार्थ्यांनी
विहित मुदतीत पाणी अर्ज सादर करून उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी लाभ घ्यावा. असे
आवाहन कार्यकारी अभियंता, वाघुर धरण विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
000
No comments:
Post a Comment