जळगाव.
दि. 14 - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यावतीने बाल विकास
क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल
झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांच्या सुप्त गुणांना वाव देवून त्यांच्यात
बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी बालकल्याण क्षेत्रात कार्यरत
संस्थांमधील मुले व इतर विद्यार्थ्यांसाठी दिनांक 14 ते 16 नोव्हेंबर, 2019
दरम्यान बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या बाल महोत्सवाचे उद्घाटन आज सकाळी
11.00 वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे महापौर सिमाताई भोळे यांच्या हस्ते पंडीत
जवाहरलाल नेहरुंच्या प्रतिमेस माल्यार्पण करून व दिपप्रज्वलीत करून करण्यात आले. याप्रसंगी महापौर सिमा भोळे आणि वैजयंती तळेले
यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद
दिक्षीत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी रफीक तडवी, सामाजिक कार्यकर्ते विकास वाघ, बाल
कल्याण समिती अध्यक्षा वैजयंती तळेले, बाल कल्याण समिती सदस्य डॉ. शैलजा चव्हाण,
नितीन विसपुते, श्रीमती संध्या वानखेडे, विधी
सल्लागार, परिवीक्षा अधिकारी श्रीमती जयश्री पाटील, सर्व संरक्षण अधिकारी, समुपदेशक,
शाळेचे शिक्षक, महिला व बाल विकास क्षेत्रातील संस्थांचे अधिक्षक, अधिकारी,
कर्मचारी आदि उपस्थित होते.
बाल महोत्सवात विभागाच्या संस्थामधील
बालके तसेच इतर शाळांमधील विद्यार्थी असे एकूण 500 बालकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन श्रीमती सारीका मेतकर-बोरसे यांनी केले तर आभार जिल्हा परिवीक्षा
अधिकारी एस.आर पाटील यांनी मानले
000
No comments:
Post a Comment