जळगाव.दि.13,
जिल्ह्यात
झालेल्या अतिवृष्टीमुळे मका,ज्वारी,सोयाबीन, सारख्या पिकांचा अकाली पावसामुळे या पिंकांच्या बडब्यावर ॲस्परजिलस नायगर
बुरशीची मोठ्या प्रमाणावर वाढ होते. अश प्रकारच्या बुरशीयुक्त कडब्यात ऑक्झॅलीक
ॲसीडचे प्रमाण वाढलेले दिसते. तसेच अतिवृष्टीमुळे कपाशीत वाढणारे पाथरीसारखे
बोंडाच्या फुलाचे/फुल गवतामध्ये सुद्धा ॲक्झालिक ॲसीडचे 18 टक्के प्रमाण जास्त असते
जनावरांना अशा प्रकारचा जारा खाऊ घातल्यास
जनावरांच्या रक्तातील कल्शियम बरोबबर संयांग हाऊन कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्फटीक तयार
होतात, त्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण
कमी हावून महत्वाचे अवयवाचे कार्य
मंदावते किंवा थांबते व जनावरांचा मृत्यु होतो. विषबाधा ही गायी,म्हशी,शेळ्या व
मेंढ्या इत्यादि जनावरांमध्ये बुरशीयुक्त चारा खाण्याचे प्रमाणावर अवलंबून असते.
बुरशीयुक्त चारा खाल्याने बाधीत
झालेल्या जनावरांमधील आजाराची लक्षणे अशी असतात सौम्य विषबाधा झाल्याची लक्षणे 1
ते 12 महिने सतत सुरशीयुक्त चाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या जनावरांमध्ये आढळून
येवून जनावरांध्ये भुक न मंदावणे, संडास पातळ होणे, जनावरांचे वजन कमी होणे तर लाळ
गळणे , जनावरे अशक्त होवून थरथर होणे, पोट फुगणे, श्वासाच्छवास घेण्यासाइी त्रास
होणे, अशा परिस्थितीत जनावरे डोके पोटावर ठेवतात,लघवी थेंब-थेंब याप्रमाणे होणे,
जनावरांच्या मागील बाजूस जलयुक्त सुज येणे ,बध्दकोष्टता हे लक्षणे तीव्र विषबाधा
लक्षणे दिसमन येतात व यामध्ये जनावरे दगावूसुध्दा शकतात.
तरी पशुपालकांनी आपल्या जनावरांना
बुरशीयुक्त चारा खाऊ घालण्यापूर्वी त्या
चाऱ्यावर चुन्याची निवळी शिंपडून वाळवून कुट्टी करूनच खाऊ घालावा, तथापि
योग्य ती काळजी घेवूनसुध्दा जनावरांना बाधा झाल्यास नजिकच्या पशुसंवर्धन
दवाखान्याशी संपर्क साधून आपले पशुधन सुरक्षित सुदृढ ठेवण्याचे आवाहन जिल्हा
पशुसंवर्धन उपायुक्त,जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****
No comments:
Post a Comment