Saturday, 2 November 2019

गिरणा प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबरपूर्वी पाणी मागणी अर्ज सादर करावेत


            जळगाव, दि. 2 -  गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव विभागाच्या अधिपत्याखालील गिरणा प्रकल्पावरील जामदा डावा कालवा, जामदा उजवा कालवा व‍ निम्नगिरणा कालव्याद्वारे व पांझण डावा कालवा यावरून व बोरी, अंजनी या मध्यम प्रकल्पावर तसेच खडकीसिम, वाघळा-1, वाघळा-2, वलठाण, राजदेहरे, कृष्णापुरी ता. चाळीसगाव पथराड, ता. भडगाव, बोळे, सावरखेडा, शिरसमणी, पिंपळकोठा-भोलाणे, म्हसवा, ता.पारोळा आर्डी, ता.अमळनेर, मन्यारखेडा, विटनेर, ता. जळगाव खडकेसिम, ता. एरंडोल या लघु प्रकल्पावरून आणि मन्याड मध्यम प्रकल्पावरून तसेच हातगाव, ब्राम्हणशेवगा, ता.चाळीसगाव व निसर्डी, ता. अमळनेर या लघु प्रकल्पावरून कालवाप्रवाही, कालवाउपसा, जलाशय उपसा, तसेच देवळी भोसर, ता. चाळीसगाव, कंकराज, ता.अमळनेर, पद्मालय, ता. एरंडोल या लाभक्षेत्रातील अधिसुचीत नदी, नाले, ओढे यावरून पाण्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोंबर ते 28 फेब्रुवारी, 2020 या मुदतीतील रब्बी हंगामातील हरबरा, ज्वारी, दादर, हायब्रीड दुरी, कडवळ, करडई, भाजीपाला व चारा इ. पिकांसाठी अटी व शर्तींची पुर्तता करणाऱ्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:

Post a Comment