Monday, 4 November 2019

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या अंतिम तारखा जाहिर

     जळगाव, दि.4 - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सन 19-20 या हंगामाकरीता डाळींब, केळी, आंबा, मोसंबी या फळपिकांसाठी भारतीय इन्शुरन्स विमा कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. भारतीय कृषि विमा कंपनी, मुंबई मार्फत जळगाव जिल्ह्यामध्ये महसूल मंडळस्तर/तालुकास्तर क्षेत्र घटक धरून ही योजना फळपिकांसाठी अधिसुचित मंडळांमध्ये राबविण्यात येणार आहे.
     या योजनेद्वारे कमी/जास्त पाऊस, वेगाचा वारा, कमी/जास्त तापमान व गारपीट या हवामान घटकाच्या  धोक्यांपासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण पुरविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत फळपिकांसाठी कर्ज घेणाऱ्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रांतील अधिसुचित फळपिकास सक्तीची राहील. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक राहील.
          पिकाचे नाव, विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता रक्कम, अंतिम मुदत अनुक्रमे  याप्रकारे आहेत -
केळी- विमा संरक्षित रक्कम-132000, गारपिट -44000, विमा हप्ता रक्कम- 6600, गारपिट -2200, अंतिम मुदत 7 नोव्हेंबर 2019, 2) डाळिंब - विमा संरक्षित रक्कम- 121000, गारपिट-40333, विमा हप्ता रक्कम-6050, गारपिट-2017, अंतिम मुदत-14 जानेवारी, 2019, 3) मोसंबी - विमा संरक्षित रक्कम-77000, गारपिट -25667, विमा संरक्षित रक्कम-3850, गारपिट-1283, अंतिम मुदत-7 नोव्हेंबर 2019, 4) आंबा- विमा संरक्षित रक्कम-121000, गारपिट 40333, विमा हप्ता रक्कम-3850, गारपिट-1283, अंतिम मुदत-31 डिसेंबर-2019, 5)द्राक्षे-विमा संरक्षित रक्कम-308000, गारपिट-102667, विमा हप्ता रक्कम-15400, गारपिट-5133, अंतिम मुदत-7 नोव्हेंबर-2019 अशी आहेत. 
     तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कृषि उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, अनिल भोकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                      000

No comments:

Post a Comment