Friday, 8 February 2019

जलयुक्त शिवार अभियान प्रकल्प आराखड्यानुसार जिल्ह्यातील 205 गावे जलयुक्त


          जळगाव, दि. 8- जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सन 2017-2018 मध्ये निवडलेल्या 206 गावांमध्ये विविध यंत्रणामार्फत करण्यात आलेल्या कामांमुळे 205 गावे जलयुक्त झाल्याचे आजच्या बैठकीत सांगण्यात आले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील,  जळगावचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, यावलचे उपवनसंरक्षक पी. पी. मोराणकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांचेसह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
            जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सन 2017-18 मध्ये निवड करण्यात आलेल्या 206 कामांमध्ये  4097 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी 4079 कामे पुर्ण झालेली आहेत. तर 13 कामे प्रगतीपथावर आहे. या कामांवर आतापर्यत 53 कोटी 28 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
          मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्ह्याला 2 हजार  शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  याकरिता जिल्ह्यातील 4547 शेतकरी यांचे अर्ज मंजूर करण्यात  आले असून त्यातील 3005 अर्जदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यापैकी 1974 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. तर 42 कामे प्रगती पथावर असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
 000000

No comments:

Post a Comment