जळगाव, दि. 12 :- महाराष्ट्राने रेशीम
शेती उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री
ना. सुषमा स्वराज आणि केंद्रीय वस्त्रोदयोग मंत्री ना. स्मृती ईराणी यांच्या हस्ते
नुकताच विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. केंद्रीय वस्त्रोद्योग
मंत्रालयाच्या केंद्रीय रेशीम मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात रेशीम संचालिक
श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सदर कार्यक्रमास केंद्रीय रेशीम
मंडळाचे अध्यक्ष हनमंतरायप्पा, वस्त्र मंत्रालयाचे सचिव श्री. राघवेंद्र सिंग,
केंद्रीय रेशीम मंडळाचे सदस्य सचिव श्री. ओखंडीयार, श्री. एस. सी. पांडे, विशेष
सचिव (वित्त) आदि मान्यवर उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment