जळगाव,
दि.8 :- शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या
काही वाहनांनी शासनाचा मोटार वाहन कर भरलेला नाही, तसेच विमा प्रमाणपत्र आणि
योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण केलेले नाही. अशी वाहने आढळून आल्यास ती जप्त करण्यात
यावीत आणि विमा व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण केल्याशिवाय मुक्त करु नयेत असे मा.
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने निर्देश दिले आहेत.
त्यानुसार
परिवहन विभागामार्फत शालेय विद्यार्थी वाहतूक करणा-या वाहनांची विशेष तपासणी मोहिम
शुक्रवार दिनांक 22 फेब्रुवारी 2019 पासून सुरु करण्यात येणार आहे. तरी सव शाळा,
स्कूल बसेस, स्कूल व्हॅन व विद्यार्थी वाहतूक करणा-या वाहनधारकांना सूचित करण्यात
येते की, आपली व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आपल्या वाहनाची सर्व
कागदपत्रे विधीग्राह्य असल्याची खात्री करुन घ्यावी. विधीग्राह्यता संपलेल्या
वाहनांच्या वाहनधारकांनी ती तात्काळ विधीग्राहय करुन घ्यावीत, असे जयंत पाटील, उप
प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment